एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vidhan Sabha Election : जागावाटपावरून दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढणार? शिंदे-अजितदादांचं समाधान होणार? 

Vidhan Sabha Election : महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटकपक्षांनी आतापासूनच अनेक जागांवर दावा सांगायला सुरूवात केली असून विधानसभेवेळी जागावाटपाचा तिढा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीतले (Mahayuti) जागावाटप शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं. महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक जागांवर दावा सांगून काँग्रेसच्याही काही जागा पळवल्या. सांगली, दक्षिण मध्य मुंबई या जागांचा वाद शेवटपर्यंत सुरू होता. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपाला चर्चेत शेवटपर्यंत गुंतवून ठाणे, नाशिक संभाजीनगर या जागा आपल्याकडे कायम राखल्या. त्यावरून  48 जागांच्या वाटपासाठी झालेली रस्सीखेच लक्षात घेता विधानसभेच्या 288 जागांचे वाटप म्हणजे किती डोकेदुखीच असणार आहे याचा साधारणता अंदाज येतो.

मुंबईत ठाकरेंचा जास्त जागांवर दावा  

ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभेच्या सुमारे सव्वाशे जागा लढवण्यासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईतल्या दोन तृतीयांश जागांवर आपला दावाही ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीत कमी जागा लढवूनही राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला हे मान्य होईल असे वाटत नाही. 

विदर्भात काँग्रेसचा दावा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईत फारशे अस्तित्व नसले तरी काँग्रेस एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या जागा सोडेल याची शक्यता तशी कमीच आहे. अर्थात ठाकरेंनी जसा मुंबईतल्या जागांवर रुमाल टाकून आपला हक्क सांगितलाय तसाच काहीसा प्रकार विदर्भातल्या जागांबाबत काँग्रेसकडून आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जागावाटप तेवढे सोपे असणार नाही 

तिकडे महायुतीतही जागा वाटपाची प्रक्रिया सहज सुलभ असेल असं वाटत नाही. भाजपाने साधारणता 150 ते 160 जागा लढवण्याचे तयारी सुरू केली आहे. तर शिंदेंनी शंभर जागांवर दावा ठोकला आहे. जेवढ्या जागा शिंदेंना मिळतील तेवढ्याच आपल्यालाही मिळाल्या पाहिजेत अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका आहे. 

महायुतीत जागांचा पेच कसा सुटणार?

या तिघांच्या अपेक्षांची बेरीज केली तर महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदारसंघ आणखी शंभराने वाढवावे लागतील. याचाच अर्थ  288 जागांचे वाटप सोपं असणार नाही हाच आहे. 2019 च्या संख्याबळानुसार जागांचं वाटप करावं असं सूत्र मान्य झालं तरी, 2014 ला निवडून आलेल्या एकसंघ पक्षाच्या जागा गृहीत धरायच्या की आता शिंदे आणि अजित दादांबरोबर असणाऱ्या आमदार यांची संख्या गृहीत धरायची हा पेच  येणारच आहे. 

शिंदे-दादांचं समाधान होणार का? 

जर सध्याचे संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपाचे स्वतःचे आणि सहयोगी पक्षाचे 114 आमदार आहेत. शिंदेंबरोबर आलेले 50 आणि दादांसोबत असलेले 40, असं 200 जागाच वाटप तर सहजपणे होऊ शकेल. पण उरलेल्या 85 जागा कशा वाटायच्या हा प्रश्न येईलच. त्या जागा संख्याबळानुसार वाटायच्या ठरल्या तर भाजपाला 40-42 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 40 अशा जागा दिल्या जातील. यामुळे भाजपाची बेरीज 150 पर्यंत जाईल. पण शिंदेंना मात्र  70 आणि अजितदादांना  60 जागा मिळू शकतील तेवढ्या जागांवर समाधान होईल का? हा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांची तशी मनस्थिती असल्याचं दिसत नाही.

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget