एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन; तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचे स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule : गणेश नाईक यांच्या प्रमाणे शिवसेनेच्या सदस्यांनी देखील जनता दरबार घेतले पाहिजे. असे म्हणत गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule : ठाणे (Thane) जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने (BJP)केली आहे का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. अशातच राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बाबत भाष्य करत शिवसेनेच्या सदस्यांनी देखील जनता दरबार घेतले पाहिजे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटतील आणि जनतेचं भलं होईल, असे म्हणत गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एकप्रकारे समर्थन करण्यात आले आहे.

सर्व सदस्यांनी जनता दरबार घेण्यास मुभा- चंद्रशेखर बावनकुळे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी ही राज्यातील अनेक भागात जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही सदस्यांनी असे जनता दरबार घेतले पाहिजे. मुळात महायुतीतील सर्व सदस्यांनी अशा पद्धतीने  जनता दरबार घेतल्यास त्याचा फायदा हा जनतेलाच होणार आहे. समजा शिवसेनेच्या अथवा राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यांनी एखाद्या जिल्ह्यात जाऊन चार आदेश पारित केले तर त्यातून जनतेचा भलं होणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना याबाबत उभा असून  कुठलाही मंत्री हाय का जिल्ह्याचा नाहीतर राज्याचा मंत्री असतो. त्यामुळे तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊ शकतो. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला- शंभुराज देसाई

दरम्यान, याचं मुद्यावरून शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ही प्रतिक्रिया देत ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गणेश नाईक भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत. शिवाय नवी मुंबई ही ठाणे जिल्ह्यात आहे. मी देखील पालकमंत्री म्हणून ठाण्यात काम केले आहे. ठाण्याचे अनेक प्रश्न शिंदे साहेबांनी सोडवले आहेत. ज्याने त्याने आपल्या पक्षाचे काम करायला हवे, यात दुमत नाही. पण ठाणे जिल्हा हा आनंद दिघे साहेबांनी 25 ते 30 वर्षापासून आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी हा किल्ला भक्कम ठेवायचे काम केले आहे.

त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे राहील यात शंका नाही. तर राहिला प्रश्न महायुतीचा, भाजप देखील महायुतीचा भाग आहे.  आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.  शिंदे साहेब शिवसेना वाढवत आहेत तसेच मंत्री नाईक हेदेखील भाजप वाढवत आहेत.  त्यामुळे त्यांचे आव्हान नाही, माध्यमांनी गैरसमज करू नये. महायुतीत आहोत त्यामुळे आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला आहे. असे ही शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 16 March 2025Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा आढावा सुपरफास्ट ABP MajhaSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलंSpecial Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
Embed widget