Bihar : बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
Nitish Kumar Resignation : बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून आता भाजपचे नेते सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

पटना : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि बिहारच्या राजकारणातल एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोन नेत्यांभोवती बिहारचं राजकारण गेली चार दशकं फिरत होतं. आता लालू-नितीश पर्वाचा अस्त होत असून इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडे मुख्यमंत्रीपद येणार आहे. त्यामुळे बिहारचे राजकारण आता नव्या वळणावर आल्याचं चित्र आहे.
BJP CM Bihar : भाजपचा पहिला मुख्यमंत्री
इतिहासात पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असून विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांच्या निवडीची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली.
Nitish Kumar Exit : दोन दशकांची इनिंग संपली
2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या नितीश कुमारांची बिहारमधील राजकीय इनिंग आता संपुष्टात आली आहे. त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणे निश्चित झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हा राजीनामा देत औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
Samrat Chaudhary Profile : राजकीय प्रवास
सम्राट चौधरी यांची राजकीय कारकीर्द लक्षवेधी आहे. ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. तारापूर मतदारसंघातून ते आमदार असून परबत्ता मतदारसंघातूनही दोन वेळा निवडून आले आहेत. ते दोन वेळा विधान परिषद सदस्य राहिले असून माजी मंत्री शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. त्यांनी राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
Political Shift Bihar : सत्तेतील मोठा बदल
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते विनोद तावडे यांनी पक्षाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं सांगितलं. दरम्यान, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या घडामोडींवर टीका केली आहे.
End of Lau Nitish Era : लालू-नितीश युगाचा अस्त
गेल्या 40 वर्षांपासून बिहारचे राजकारण लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या भोवती फिरत होते. दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीतून पुढे आले होते. आता या दोन्ही नेत्यांचे वर्चस्व संपत असून बिहारमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होत आहे.
ही बातमी वाचा:





















