मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि माजी आमदार आणि नुकतेच सहकार परिषदेचे अध्यक्ष झालेले राजन पाटील (Rajan Patil) यांच्यातील अंतर्गत संघर्ष समोर येत आहे.
![मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत Ajit Pawar group spokesperson Umesh Patil Facebook post for mohol vidhansabha Election ncp news solapur rajan patil मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/05/d44973e66182869a49273f42f83fc65a1728101489954339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Umesh Patil : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात देखील राजकीय वातावरण तापलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत असलेली अंतर्गत खदखद समोर येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि माजी आमदार आणि नुकतेच सहकार परिषदेचे अध्यक्ष झालेले राजन पाटील (Rajan Patil) यांच्यातील अंतर्गत संघर्ष समोर येत आहे. याला कारण म्हणजे उमेश पाटील यांनी केलेली फेसबूक पोस्ट. मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय अशी पोस्ट उमेश पाटील यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
सध्या यशवंत माने हे मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. ते राजन पाटील यांचे समर्थक आहेत. मात्र, आता मोहोळ तालुक्यात आमदार बदलण्याच्या चर्चा सुरु झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनच त्यांना उमेदवारीसाठी विरोध होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
उमेश पाटील अजित पवारांची साथ सोडणार का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आलाय. दरम्यान, यामुळे राजन पाटलांचे विरोधक आणि अजित पवारांचे समर्थक उमेश पाटील नाराज झाले आहेत. लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगण्याचा अभिमान असणाऱ्या माणसांवर पक्ष विश्वास ठेवतय याचं वाईट वाटतं. ज्यांनी आयुष्यभर सहकार संस्था बुडवल्या त्यांनाच आता सहकार परिषदेचे अध्यक्ष पद बहाल केले गेलाय, अशी खंत उमेश पाटलांनी व्यक्त केली होती. उमेश पाटील यांनी थेट मी राजीनामा लिहून ठेवला असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर सोबत राहिलेले उमेश पाटील आता अजितदादांची साथ सोडतात का? असा प्रश्न निर्माण झालाय.
एका व्यक्तीला न्याय देण्यासाठी सर्वासामान्य लोकांवर अन्याय
मी राजीनामा घेऊन गेलो होतो मात्र माझा राजीनामा स्वीकारला गेला नाही. पक्षाने वेळ मागितला असल्याचे उमेश पाटील म्हणाले होते. मी अतिशय शांत डोक्याने विचार करून हा निर्णय घेतला आहे. राजन पाटील जिथं असतात तोच आमदार निवडून येतो असं पक्षाला समज झाला असेल. पण आता काळ बदललंय, लोकांची भूमिका बदलली आहे. हे पक्षापर्यंत कसं पोहोचत नाहीये हे मलाही न समजणारे कोडे आहे. एका व्यक्तीला न्याय देण्यासाठी सर्वासामान्य लोकांवर अन्याय झाला असल्याचे उमेश पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Umesh Patil on Ajit Pawar : अजितदादांकडून राजन पाटलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा, नाराज झालेल्या उमेश पाटलांनी राजीनामा लिहून ठेवला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)