एक्स्प्लोर

वर्सोव्याचा समुद्रकिनारा स्वच्छ करणाऱ्या अफरोजची पंतप्रधानांकडून दखल

नवी दिल्ली : घाणीचं साम्राज्य असलेल्या वर्सोवा बीचला स्वच्छ करणाऱ्या अफरोज शहा यांची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. वैयक्तिक पातळीवर स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी 'मन की बात'मधून व्यक्त केलं. त्यावेळी अफरोज शहा यांच्या कामाचं कौतुक करुन अशा व्यक्तींची देशाला जास्त गरज असल्याचं मोदींनी म्हणलं आहे. याशिवाय, रॅन्समवेअर सायबर हल्ला, आंतरराष्ट्रीय योग दिवस आदींचा त्यांनी यावेळी आपल्या कार्यक्रमात उल्लेख केला. तसेच रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवाना शुभेच्छा देताना, रमजानचा पवित्र महिना शांतता आणि एकतेचा संदेश देत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी सर्व भारतीयांनी जगाला तीन पिढ्यांचं दर्शन द्यावं असं सांगितलं. तसेच या दिवशीचे फोटो #InternationalyogaDay, Narendra Modi App आणि MY Gov वर अपलोड करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. शिवाय स्वच्छतेसाठी वैयक्तिक पातळीवर स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत मांडलं. तसेच सर्व देशवासियांना कचराकुंडीचा वापर करण्याचे आवाहन केलं. कचराकुंडीचा वापर वाढवण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनी चार हजार शहरांमधील ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कचरा कुंड्या उपलब्ध असतील, असं सांगितलं. विशेष म्हणजे, स्वच्छता अभियानात मुंबईतल्या वर्सोवामधील अफरोज शाहच्या कामाचा पंतप्रधान मोदींनी यावेळी विशेष उल्लेख केला. अफरोजच्या कामाचा आपल्याला अभिमान वाटतो. अफरोजसारख्या व्यक्तींची देशाला जास्त गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील उच्चभ्रु वस्तीतील भाग हगणदारीमुक्त झाला ,याबद्दलही तेथील परिसरातील नागरिकांचं अभिनंदन केलं. या भागातील महिलांनी मशाल फेरी काढून घरोघरी जाऊन यासाठी नागरिकांना अभियानात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिलं. दरम्यान, मोदी सरकारच्या कार्यकाळाची तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्याबद्दल, सध्या देशभरातील विविध प्रसार माध्यमांमधून जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर पंतप्रधानांनी विरोधकांना चिमटा काढत, त्यांच्या टीकेतूनही प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आभार मानले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आपल्या कार्यक्रमातूनही पंतप्रधानांनी सावरकरांना अभिवादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो संघर्ष दिला. त्याची अनुभूती आंदमानच्या सेल्यूलर जेलमध्ये गेल्याशिवाय होणार नाही, असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 26 February 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने समस्यांचा लवकरच अंत, आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने समस्यांचा लवकरच अंत, आजचे राशीभविष्य वाचा...
मुंबई महापालिकेवर कर्जाचे ओझे! तब्बल 2.44 लाख कोटींचा आर्थिक बोजा, आर्थिक ताण वाढला
मुंबई महापालिकेवर कर्जाचे ओझे! तब्बल 2.44 लाख कोटींचा आर्थिक बोजा, आर्थिक ताण वाढला
साताऱ्यात 'कोयता गॅंग'चा थरार! करंजे पेठेत तरुणावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
साताऱ्यात 'कोयता गॅंग'चा थरार! करंजे पेठेत तरुणावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Ajit Pawar : बारामती पोलीस स्टेशनमधील ब्लॅक बॉक्सचा फोटो व्हायरल, अजितदादांच्या अपघातावरून पुन्हा चर्चांना उधाण
बारामती पोलीस स्टेशनमधील ब्लॅक बॉक्सचा फोटो व्हायरल, अजितदादांच्या अपघातावरून पुन्हा चर्चांना उधाण

व्हिडीओ

Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
Pankja Munde Mumbai : प्रीतम मुंडे राज्यसभेवर जाणार? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या..
Bhigwan Kidnapping Case : मला आईकडे जायचं आहे, इंदापूरजवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India semi final Scenario : 75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
Gadchiroli : गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार
'रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनचा पुनर्विचार करण्याची गरज' टीम इंडियाच्या माजी हेडमास्तरांचं मोठं विधान! करा किंवा मरा सामन्यापूर्वी गंभीर आणि सूर्यकुमारला सुद्धा अप्रत्यक्ष इशारा
'रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनचा पुनर्विचार करण्याची गरज' टीम इंडियाच्या माजी हेडमास्तरांचं मोठं विधान! करा किंवा मरा सामन्यापूर्वी गंभीर आणि सूर्यकुमारला सुद्धा अप्रत्यक्ष इशारा
काही करून न्यूझीलंड हारला पाहिजे आणि श्रीलंका जिंकली पाहिजे! टीम इंडियानंतर पाकिस्तान सुद्धा भलत्याच धर्मसंकटात; आज काय होणार?
काही करून न्यूझीलंड हारला पाहिजे आणि श्रीलंका जिंकली पाहिजे! टीम इंडियानंतर पाकिस्तान सुद्धा भलत्याच धर्मसंकटात; आज काय होणार?
Ramdas Athawale : राज्यसभेत निवडून जाणार हे माहिती, पण लोकसभा लढण्याची इच्छा; रामदास आठवले यांचे स्पष्ट वक्तव्य
राज्यसभेत निवडून जाणार हे माहिती, पण लोकसभा लढण्याची इच्छा; रामदास आठवले यांचे स्पष्ट वक्तव्य
इंग्लंड सेमीफायनल गाठून देणाऱ्या कॅप्टन ब्रूकने असाही इतिहास रचला! पाकिस्तानी बाबर आझमच्या नावावर स्वत:लाच लाज वाटेल असा पराक्रम
इंग्लंड सेमीफायनल गाठून देणाऱ्या कॅप्टन ब्रूकने असाही इतिहास रचला! पाकिस्तानी बाबर आझमच्या नावावर स्वत:लाच लाज वाटेल असा पराक्रम
Mumbai feriwala BMC Budget 2026: मुंबईतील फेरीवाल्यांसाठी BMC चा महत्त्वाचा निर्णय, फेरीवाल्यांना QR Code आधारित प्रमाणपत्र देणार
Mumbai feriwala BMC Budget 2026: मुंबईतील फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी, BMC चा महत्त्वाचा निर्णय, रस्त्यावर दुकान मांडायचं असेल तर काय करावं लागणार?
Embed widget