एक्स्प्लोर

कालव्याची दुरुस्ती न करता वांद्री प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडलं, पालघरमधील 19 गावांतील रब्बी पिकांचं मोठं नुकसान 

Palghar Agriculture:  कालव्यांची अर्धवट दुरुस्ती करून शेतीसाठी पाणी सोडल्याने कालव्यांमधील पाणी थेट रब्बी पिकांमध्ये गेलं आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.

पालघर: वांद्री प्रकल्पातून कालव्यांची दुरुस्ती न करताच शेतीसाठी पाणी सोडल्याने पालघर पूर्वेस असलेल्या 18 ते 19 गावांमधील शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतीत गेलेल्या पाण्यामुळे मूग, वाल, वटाणे, तीळ ही पीकं नष्ट झाली आहेत. 

पालघरच्या पूर्वेस असलेल्या अनेक गावांमध्ये दुबार शेतीसाठी वांद्री प्रकल्पातून कालव्यांमार्फत पाणी सोडलं जातं. मात्र या कालव्यांची अर्धवट दुरुस्ती करून शेतीसाठी पाणी सोडल्याने कालव्यांमधील पाणी थेट रब्बी पिकांमध्ये गेलं आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी आज या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात लवकरच आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. 

पालघरच्या पूर्व भागात असलेल्या कुडे, नावझे, दहिसरसह परिसरातील 18 ते 19 गावांमध्ये दुबार शेतीसाठी वांद्री प्रकल्पातून कालव्यांमार्फत पाणी सोडलं जातं. मात्र याच भागात रब्बी पिकाचंही मोठं उत्पादन घेतलं जात असल्याने कालव्यांची दुरुस्ती करूनच पाणी सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पाठबंधारे विभागाने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.  झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे घडलेल्या प्रकारावरुन चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. वांद्री धरणाच्या कालव्यांमधून निघालेल्या पाण्यामुळे पालघर पूर्वेस असलेल्या शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकाचं नुकसान झालं असून याची प्रत्यक्ष पाहणी करून खासदार गावित यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. कमी दरात काम भरून निकृष्ट दर्जाची काम होत असतानाही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याच सांगत निकृष्ट दर्जाची काम होत असताना तुम्ही अधिकारी या ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच तुम्ही ठेकेदारांवर कारवाई करत नसाल तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल असा इशाराही गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

ही बातमी वाचा: 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget