एक्स्प्लोर

Sharad Pawar: छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकालाही विरोध झाला होता, तोच वर्ग आज महाराष्ट्रातील ऐक्याला धोका निर्माण करतोय: शरद पवार

Navi Mumbai News:शिवरायांच्या काळातही सामाजिक ऐक्याला धोका उत्पन्न करणारा वर्ग होता, तशाच वर्गामुळे आता महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. समाजाला एकसंध करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई: मणिपूरमध्ये अनेकांची घरं जळत असताना, शेती उद्ध्वस्त होत असताना आणि स्रियांवर अत्याचार सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. पंतप्रधानांना त्याठिकाणी साधी चक्कर टाकावी वाटली नाही. एखाद्या राज्यावर एवढं मोठं संकट आल्यावर राज्यकर्त्यांची जबाबदारी असते की त्याला सामोरं जावं, तेथील लोकांना विश्वास द्यावा, त्यांच्यात एकवाक्यता निर्माण करावी आणि कायदा-सुव्यवस्था  जतन करावी. पण पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी त्यापैकी काहीही केले नाही, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूर आणि इतर राज्यांतील दंगलीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्रात आणि देशातील परिस्थितीत बदल करण्याची गरज आहे. तो बदल करायचा असेल तर सर्व जात-धर्म, भाषा यामध्ये जे अंत आहे, त्याचे विस्मरण करुन एकसंध समजा आणि एकसंध राष्ट्र ही संकल्पना घेऊन एकत्रित काम करण्याची आपल्याला गरज आहे. तो करण्यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

मणिपूरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची मोदींवर टीका

देशाच्या संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची (Manipur Violence) चर्चा झाली. मणिपूरचे विविध जाती, भाषा बोलणारे लोक दिल्लीला आले होते, त्यांनी आम्हाला माहिती दिली. मणिपूरमध्ये पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला, दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरदारं पेटवण्यात आली, शेती उद्ध्वस्त करण्यात आली, स्त्रियांवर अत्याचार झाले. पिढ्यानुपिढ्या एकत्र राहणारा, सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटते. एवढं मोठं संकट राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, त्यांना सामोरे जाणे. पण पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरकडे ढुंकून पाहिलं नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिंता: शरद पवार

मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं, खाली कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही काही घडले की काय, अशी चिंता वाटायला लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊ गेले आहेत. त्यांनी समाजाचा विचार केला. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर अनेक राजे होऊन गेल्याचे ऐकायला मिळेल. पण 350 वर्ष झाल्यानंतरही आजही आदर आणि अभिमान असणारा राजा कोण, असा प्रश्न कोणालाही विचारल्यावर एकच नवा येतं, ते म्हणजे शिवछत्रपती. त्यांनी लोकांसाठी राज्य केले. या देशात अनेक राजे होऊन गेले. दिल्ली मुघलांची होती, देवगिरी यादवांची होती, राजपूतांचं राज्य होतं, पण शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं नव्हे तर हिंदवी आणि रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्याला दिले, असे हे शरद पवार यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या काळातही काहींनी त्यांना विरोध केला. त्यांचा राज्याभिषेक करायचा होता तेव्हा एका स्थानिक समाजातील लोकांनी त्याला विरोध केला. शेवटी उत्तरेकडून कोणालातरी आणावं लागलं. त्या कालखंडात ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग होता. दुर्दैवाने हा वर्ग आजही कुठे ना कुठे बघायला मिळतो. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

VIDEO: शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

आणखी वाचा

शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन, माझे विचार आणि संस्कार काय सांगतात ते महत्त्वाचं : मनोज जरांगे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
Pune Leopard: वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
Nagpur Leoprad : नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
Pune Leopard: वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
Nagpur Leoprad : नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
Devendra Fadnavis & Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
Bhandara Crime: शासकीय ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी, 10 लाखांची खंडणी; बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाविरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल
शासकीय ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी, 10 लाखांची खंडणी; बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाविरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल
Guru Transit 2026: 2025 वर्ष कठीण काळ? 2026 वर्षात 3 राशींचं सुख दुप्पट होणार, गुरू ग्रहाचे संक्रमण, दत्तगुरूंच्या कृपेने संपत्तीचा मार्ग मोकळा
2025 वर्ष कठीण काळ? 2026 वर्षात 3 राशींचं सुख दुप्पट होणार, गुरू ग्रहाचे संक्रमण, दत्तगुरूंच्या कृपेने संपत्तीचा मार्ग मोकळा
Dhurandhar Box Office Collection Day 5: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर वणवा; दिग्गजांच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर, फक्त पाचच दिवसांत कमावले अब्जावधी
'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर वणवा; दिग्गजांच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर, पाच दिवसांची कमाई किती?
Embed widget