एक्स्प्लोर

Sharad Pawar: छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकालाही विरोध झाला होता, तोच वर्ग आज महाराष्ट्रातील ऐक्याला धोका निर्माण करतोय: शरद पवार

Navi Mumbai News:शिवरायांच्या काळातही सामाजिक ऐक्याला धोका उत्पन्न करणारा वर्ग होता, तशाच वर्गामुळे आता महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. समाजाला एकसंध करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई: मणिपूरमध्ये अनेकांची घरं जळत असताना, शेती उद्ध्वस्त होत असताना आणि स्रियांवर अत्याचार सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. पंतप्रधानांना त्याठिकाणी साधी चक्कर टाकावी वाटली नाही. एखाद्या राज्यावर एवढं मोठं संकट आल्यावर राज्यकर्त्यांची जबाबदारी असते की त्याला सामोरं जावं, तेथील लोकांना विश्वास द्यावा, त्यांच्यात एकवाक्यता निर्माण करावी आणि कायदा-सुव्यवस्था  जतन करावी. पण पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी त्यापैकी काहीही केले नाही, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूर आणि इतर राज्यांतील दंगलीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्रात आणि देशातील परिस्थितीत बदल करण्याची गरज आहे. तो बदल करायचा असेल तर सर्व जात-धर्म, भाषा यामध्ये जे अंत आहे, त्याचे विस्मरण करुन एकसंध समजा आणि एकसंध राष्ट्र ही संकल्पना घेऊन एकत्रित काम करण्याची आपल्याला गरज आहे. तो करण्यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

मणिपूरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची मोदींवर टीका

देशाच्या संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची (Manipur Violence) चर्चा झाली. मणिपूरचे विविध जाती, भाषा बोलणारे लोक दिल्लीला आले होते, त्यांनी आम्हाला माहिती दिली. मणिपूरमध्ये पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला, दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरदारं पेटवण्यात आली, शेती उद्ध्वस्त करण्यात आली, स्त्रियांवर अत्याचार झाले. पिढ्यानुपिढ्या एकत्र राहणारा, सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटते. एवढं मोठं संकट राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, त्यांना सामोरे जाणे. पण पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरकडे ढुंकून पाहिलं नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिंता: शरद पवार

मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं, खाली कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही काही घडले की काय, अशी चिंता वाटायला लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊ गेले आहेत. त्यांनी समाजाचा विचार केला. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर अनेक राजे होऊन गेल्याचे ऐकायला मिळेल. पण 350 वर्ष झाल्यानंतरही आजही आदर आणि अभिमान असणारा राजा कोण, असा प्रश्न कोणालाही विचारल्यावर एकच नवा येतं, ते म्हणजे शिवछत्रपती. त्यांनी लोकांसाठी राज्य केले. या देशात अनेक राजे होऊन गेले. दिल्ली मुघलांची होती, देवगिरी यादवांची होती, राजपूतांचं राज्य होतं, पण शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं नव्हे तर हिंदवी आणि रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्याला दिले, असे हे शरद पवार यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या काळातही काहींनी त्यांना विरोध केला. त्यांचा राज्याभिषेक करायचा होता तेव्हा एका स्थानिक समाजातील लोकांनी त्याला विरोध केला. शेवटी उत्तरेकडून कोणालातरी आणावं लागलं. त्या कालखंडात ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग होता. दुर्दैवाने हा वर्ग आजही कुठे ना कुठे बघायला मिळतो. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

VIDEO: शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

आणखी वाचा

शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन, माझे विचार आणि संस्कार काय सांगतात ते महत्त्वाचं : मनोज जरांगे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget