एक्स्प्लोर

नाशकात जोर'धार', राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे उड्डाण पुलावरून रस्त्यावर कोसळले धबधबे

Nashik Rain Update : नाशिकमध्ये पहिल्याच पावसात सरकारी कामाची दैना उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे नाशिकच्या रस्त्यावर धबधबे कोसळले आहेत.

Nashik Rain Update : नाशिक शहरात अखेर आज (दि. 13) जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली. सकाळपासूनच नाशिकमध्ये दमट वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात जोरदार हजेरी लावली. जवळपास एक तास सुरू असलेल्या पावसाने नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) गुडघाभर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. 

महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाणी साचल्याने अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र बहुप्रतिक्षित मान्सूनने (Monsoon) अखेर नाशिक शहरात दमदार हजेरी लावल्याने आता नाशिककर सुखावले आहेत. तर नाशिक शहरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत.

पहिल्याच पावसात सरकारी कामाची दैना

तर पहिल्याच पावसात सरकारी कामाची दैना उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) गलथान कारभारामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. उड्डाणपूलावरील पाण्याचा नाचरा होण्याची व्यवस्था नसल्यानं, उड्डाणपुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला अक्षरशः धबधब्याचे रूप आले आहे. 

उड्डाणपूलाखालून जाणाऱ्या नागरिकांची धांदल

उड्डाणपूलाखाली अर्धवट अवस्थेत पाईप असल्यानं पुलावरील पाणी धोधो रस्त्यावर पडत होते. यामुळे पुलाखालून जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडाल्याचे दिसून आले. या पाण्यामुळे उड्डाणपुलाखाली काही काळ वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. महामार्ग प्राधिकरणाने पुढील काळात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

1 हजार 307 गाव-वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील काही भागात मागील आठवड्यात दोन दिवस पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून अजून सक्रीय झाल्याचे दिसत नाही. तर मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या 366 गावे आणि 941 वाड्या अशा एकूण 1 हजार 307 गाव-वाड्यांना 399 टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ११ जून अखेर केवळ 8.14 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) सध्या 19.45 टक्के पाणीसाठी आहे. तर गंगापूर धरण समुहात एकूण 17.06 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील काही दिवसात मुसळधार स्वरुपात (Rain) पाऊस न कोसळल्यास पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात खरंच पाऊस विश्रांती घेणार का? पंजाबराव डख यांनी दिली मोठी माहिती

आज कसं असणार राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget