एक्स्प्लोर

Dada Bhuse : "हो म्हणायला कोणीही हो म्हणेल, पण...; मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे वक्तव्य

Nashik News : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही. शिंदे समितीच्या माध्यमातून दिवसरात्र काम सुरू असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

Dada Bhuse नाशिक : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. दीड कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या मुंबईची आहे. त्यांच्या काही सूचना असतील तर त्यावर सरकार चर्चा करेल. हो म्हणायला कोणीही हो म्हणेल, पण समाजाची फसवणूक होईल असे आम्ही वागणार नाही, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, कोर्टात आरक्षण टिकलं पाहिजे, असे वक्तव्य नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले आहे.   

स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) आज आपण साजरा करत आहोत. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथे आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर पत्रकरांशी संवाद साधतांना दादा भुसे बोलत होते.  

आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही

मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) आंदोलनावर दादा भुसे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही.  इतर आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत असणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी त्या सांगाव्यात. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित आहे.  आनंदाची बाब म्हणजे क्युरेटिव्ह पिटीशन दाखल आहे. 

चार हजारापेक्षा अधिक तरुण नोकरीवर रुजू

शिंदे समितीच्या माध्यमातून दिवसरात्र काम सुरू आहे. सर्वच जण प्रयत्न करत आहेत. काय, काय केलं हे सर्व त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  सर्व मिडियासमोरही काय केले जात आहे याबाबत माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी कधीही न झालेले निर्णय या सरकारने घेतले आहेत.  4 हजारापेक्षा अधिक तरुण-तरुणींना नोकरीवर रुजू केले आहे. 

कोर्टात आरक्षण टिकलं पाहिजे

जरांगे पाटील आणि मराठा समाजाला विनंती असणार आहे की, यात काय केले पाहिजे सांगावे. यात सरकार मार्गक्रमण करेल. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. दीड कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या मुंबईची आहे. त्यांच्या काही सूचना असतील तर त्यावर सरकार चर्चा करेल. हो म्हणायला कोणीही हो म्हणेल, पण समाजाची  फसवणूक होईल, असे आम्ही वागणार नाही, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, कोर्टात आरक्षण टिकलं पाहिजे, असेही दादा भुसे म्हणाले. 

मुख्यमंत्रीनी शिवाजी महाराजांची घेतली शपथ

यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत काहीही होत नव्हतं. मुख्यमंत्रीनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून डेटा कलेक्ट करत आहेत. दीड लाख कर्मचारी यावर काम करत आहे. मुख्यमंत्री चर्चेसाठी अंतरवलीला सुद्धा गेले होते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Embed widget