एक्स्प्लोर

Nashik Uday Samant : वेदांता फॉक्सकॉनबाबत आठ दिवसात श्वेतपत्रिका काढणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा 

Nashik Uday Samant : वेदांता फॉक्सकॉनसह ज्या ज्या विषयावर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. 

Nashik Uday Samant : सद्यस्थितीत रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery) विरोध करण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पसाठी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहले होते. आता हेच लोक विरोध करत आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसात वेदांता फॉक्सकॉनसह ज्या-ज्या विषयांवर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेतपत्रिका पुढील आठ दिवसात काढणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. 

आज उदय सामंत (Uday Samant) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून दुसरीकडे बारसू रिफायनरी संदर्भांत स्थानिक लोकांनी आंदोलन छेडले आहे. अनेक महिलांनी आंदोलनात सहभागी होत रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. मात्र दुसरीकडे उदय सामंत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. जी लोक या रिफायनरीला विरोध करत आहेत./ त्यांनीच या प्रकल्पाबाबत पत्र लिहल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यावेळी नाणार प्रकल्प होणार होता, त्यावेळी तेथील लोकांच्या तीव्र आंदोलनामुळे ती जागा बदलण्यात आली. त्यांनतर जवळच्या बारसू गावानजीक हा प्रकल्प उभारण्याचे ठरले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी पत्र लिहून नव्या जागेबाबत पंतप्रधानांना कळविले असल्याचे सामंत म्हणाले. 

उदय सामंत यावेळी म्हणाले कि, रिफायनरीच्या कामात राजकारण केले जात असून जालियनवाला बाग ची तुलना केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच 12 जानेवारी 2022 ला पत्र लिहिले होते. यात बारसुमध्ये 1300 एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो, असे पत्र लिहिले होते. या पत्रात म्हटले होते कि, पर्यावरणचा ह्रास होणार नाही, राज्याचा जीडीपी वाढणार असे पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहले होते. मात्र त्यावेळी कोणाशी चर्चा झाली, माहिती नाही, याबाबतचे ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या जागी शिंदे मुख्यमंत्री असते तर प्रकल्प कधीच पुढे गेला असता, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान सेना भवनवर एक पत्रकार परिषद झाली होती. त्यात रिफायनरी आम्ही आणली त्याचे श्रेय सरकारने घेऊ नये, असे म्हटले होते. आता यात राजकारण का? आता विरोध का होत आहे. याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, दुटप्पी राजकारण बंद झाले पाहिजे. सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. उद्योग बाहेर गेले म्हणून सांगणारे आता उद्योग येत असताना विरोध का करत आहेत, याचे उत्तर दिले पाहिजे, असे सामंत म्हणाले. पत्र लिहण्यावर आक्षेप नाही, पण तर पत्रकार परिषद घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी आहे. शिवाय या प्रकल्पासंदर्भात शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा झाली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून फडणवीस यांनी नांनार प्रकल्प रद्द केला, मग आता विरोध का? याचे उत्तर ठाकरे यांनी दिले पाहिजे, असा प्रश्न ठाकरे यांना केला.

कोणतेही आंदोलन सुरू नाही.... 

समृध्दीच्या बाबतीतही तेच होत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विट केले, ते गैरसमज होता. आता कोणतेही आंदोलन सुरू नाही. 12 तारखेच्या पत्रामुळे सर्वेक्षण सुरू आहे. पुढील 30/40 दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणार असून हार्ड अँड फास्ट कुठलेही काम होणार नाही. सर्वेक्षणासाठी नाटे परिसरात बोअर मारून झाले म्हणजे तिथे विरोध नाही. एकूण 65 टक्के लोकांनीं समर्थन दिले आहे. सध्या माती परीक्षण केले जात असून प्रकल्प करण्यासाठी जागा योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर प्रकल्प करायचा की नाही हे ठरवू, असे सूतोवाचही सामंत यांनी दिले. 

श्वेतपत्रिका काढणार 

दरम्यान शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या पाठीशी सरकार आहे. मागील नऊ महिन्याच्या कार्यकाळात एकही नियमबाह्य काम केले नाही, भविष्यात ही करणार नाही. वेदांता फॉक्सकोनसह ज्या ज्या विषयावर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेत पत्रिका पुढील आठ दिवसात काढणार आहे. डावोसला 1 लाख 37 हजार कोटी करार झालेत, त्याचे कामही सुरू झाले आहेत. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रला पहिल्या क्रमांकावर नेल्या शिवाय राहणार 
नाही असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget