एक्स्प्लोर

Sanjay Raut : 'शिवसेना फोडण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवेत', नाशिकमध्ये संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल 

Sanjay Raut : सत्तांतराला एकच कारण आहे, भाजप पक्षाला (BJP) शिवसेना (Shivsena) पक्ष फोडायचा नाही तर संपवायचा आहे, हेच षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

Sanjay Raut : सत्तांतराला कारण एकच आहे शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) पक्षाला शिवसेना पक्ष फोडायचा नाही तर संपवायचा आहे, हेच भाजपचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत  (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. शिवाय शिवसेना फोडण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवेत असा घाणघातही त्यांनी यावेळी केला. 

संजय राऊत नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली. हीच गळती भरून काढण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले नाशिक हे शिवसेनेचे महत्वाचं केंद्र आहे. शिवाय प्रत्येकवेळी नाशिक बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहिले आहे. तिकडे काय चाललंय, याकडे नाशिककरांनी लक्ष देऊ नये,नाशिक, नांदगाव, मालेगाव मधील प्रत्येक शिवसैनिक आज शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे. तर नाशिकचे सगळे नगरसेवक माझ्या सोबत आहेत, त्यामुळे नाशिकपासून हि सुरवात करतो आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

तसेच नाशिकचं सांगाल तर शिवसेना जागच्या जागी आहे, शिवसेनेने तसे शिवसैनिक घडविले आहेत. जनता वाट पाहते आहे, त्यामुळे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचणार आहोत. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं, काय करतोय हे महाराष्ट्र जाणतोच, राष्ट्रवादी निधी देत नाही, मुख्यमंत्री भेटत नाही, अशी करणे दिलीत, मात्र सत्तांतराला कारण एकच आहे ते म्हणजे शिवसेना, भाजप पक्षाला शिवसेना पक्ष फोडायचा नाही तर संपवायचा आहे, हेच भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

तसेच राज्यात सत्तांतर झालं खरे मात्र हिंदुत्वादी म्हणवून घेणाऱ्या ४० जणांनी भूमिका स्पष्ट करावी, बंडखोर आमदारांनी स्वतःच अस्तित्व निर्माण करा,  महाराष्ट्राची जनता जागरूक आहे, चाणाक्ष आहे, जे घडलाय महाराष्ट्रात ते जाणून आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, शिवाय जे आमदार गेलेत, त्यांचे चिरंजीव युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, मग आता काय करणार. सध्या उपस्थित झालेला चिन्हाच्या प्रश्नांवर ते म्हणाले धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत दुपारी बोलणार आहेत, आज शिवसैनिकांना बरे दिवस आलेत, कारण मुख्यमंत्री शिवसैनिक, विधानसभा अध्यक्ष शिवसैनिक. यावरून असं लक्षात येते कि, शिवसेना फोडण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवेत असा घाणाघातही त्यांनी यावेळी भाजपवर केला. 

नगरसेवकांच्या प्रवेशावर म्हणाले... 
मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल तिथे प्रशासक नेमलेले आहेत. आता तिथे कोणीही नगरसेवक नाही. नगरसेवक गेले ते चुकीचं आहे, त्यांना परत आता निवडून यावे लागेल, या तिन्ही भागात शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील, हे कदाचित माजी नगरसेवक असतील, कारण तिन्ही महानगरपालिकेची मुदत संपल्यामुळे सध्या तिथे प्रशासक आहेत, मग नगरसेवक कसे असू शकतात, त्यामुळे चुकीची माहिती देऊ नका, अफवा पसरवू नका, सरकार बदललं असलं तरी अफवांना राजमान्यता मिळालेली नसल्याचे राऊत म्हणाले. 

संजय राऊत सकाळच्या ट्विटवर म्हणाले... 
आमच्यासाठी संपूर्ण आकाश खुलं आहे, आम्ही आता नव्याने उभारी घेऊ, आता वाघाची झेप घेऊ त्याने अवघा महाराष्ट्र पकडीत येईल, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. लोक शिवसेनेच्या मागे आहेत, उद्धव ठाकरे यांच्या मागे आहेत, हे सगळं एका चिडीतून उभं राहील आहे, भावना तर आहेत, पण चिडीतून. महाराष्ट्रात हे कस घडू शकत,  मातोश्रीच्या पाठीत अशाप्रकारे खंजीर खुपसला जाऊ शकतो, बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवा बाबत अशी दगाबाजी कशी होऊ शकते, ज्या मातोश्रीने भरभरून दिल सगळ्यांना त्यांच्याबाबत हा जो प्रकार झाला आहे, तो राज्यातील जनतेला अजिबात आवडलेला नाहीय, हे दिल्लीच कारस्थान आहे. महाराष्ट्राच्या विरुद्ध, महाराष्ट्राची बदनामी करणं, महाराष्ट्राचे तुकडे करणं, मुंबईला आमच्यापासून तोडणं, त्यासाठी शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
Girish Mahajan: 'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
Chhagan Bhujbal: नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'
नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget