एक्स्प्लोर

शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

Jayant Patil on Prakash Ambedkar : मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीला शरद पवार यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबतच आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Election 2024) शरद पवार हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, पण इतर लहान समाजांनाही सोबत घ्यावं," अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. यावरून प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला. 

लोकांचा गैरसमज करणे चुकीचे

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर जयंत पाटील म्हणाले की, त्यांनी आरोप केला म्हणजे तसं होतं तसं थोडी आहे. जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहे. सरकार त्या बाबतीत लवकर निर्णय घेत नाही. जरांगेंचं आंदोलन असो किंवा ओबीसी समाजाचं लोकांच्या आंदोलन असो, सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असंतोष आहे. आता हे कोण-कोणाच्या जवळ आहे असे निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणे हे चुकीचं आहे. ते त्यांच्या जीवावर, ताकदीवर आंदोलन करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे. 

नेमकं काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? 

शरद पवार हे जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीला शरद पवार यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यासाठी ते प्रयत्न करतील, असे देखील स्पष्ट झाले आहे. मात्र शरद पवार यांचा हा प्रयत्न विधानसभेच्या निवडणुकीनंतर होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

गाडीत बसलेल्या माणसाचा एन्काऊंटर करायची गरज काय?

दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कोणाचाही दुमत नाही. प्रश्न एक अक्षय शिंदेने जे कृत्य केले, ज्या संस्थेत केलं त्या संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला? त्यांना कोणाला प्रोटेक्ट करायचं होतं?  पालक पोलिसांकडे गेल्यानंतर गुन्हा नोंदवायला उशीर केला याच्यात कोणाचा दबाव होता? एक स्टोरी म्हणजे त्यांनी पोलिसांची पिस्तुल काढली आणि स्वतःचा शेवट करून घेतला. दुसरी स्टोरी  काही वेळाने बाहेर आली. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. गाडीत बसलेल्या माणसाचा एन्काऊंटर करायची गरज काय? अक्षय शिंदे याला फाशी व्हावी ही पूर्वीपासूनची मागणी होती. आम्ही अक्षय शिंदेचा कुठेही समर्थन करत नाही, असे त्यांनी सांगितले.  

आणखी वाचा

Akshay Shinde Encounter: '...अन् मी अक्षय शिंदेवर गोळी झाडली'; पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण, FIR मधील जबाब आला समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Employee Salary : मोठी बातमी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार, जीआर निघाला
मोठी बातमी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार, जीआर निघाला
Sadabhau Khot  : गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
Baban Taywade : सरकार पाडण्याची भाषा करता, मनोज जरांगेंकडे आमदार किती? बबनराव तायवाडे यांचा प्रश्न
सरकार पाडण्याची भाषा करता, मनोज जरांगेंकडे आमदार किती? बबनराव तायवाडे यांचा प्रश्न
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला, पुण्यात शेतकऱ्यांना जोरदार धक्काबुक्की अन् राडा
सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला, पुण्यात शेतकऱ्यांना जोरदार धक्काबुक्की अन् राडा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Salary : मोठी बातमी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार, जीआर निघाला
मोठी बातमी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार, जीआर निघाला
Sadabhau Khot  : गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
Baban Taywade : सरकार पाडण्याची भाषा करता, मनोज जरांगेंकडे आमदार किती? बबनराव तायवाडे यांचा प्रश्न
सरकार पाडण्याची भाषा करता, मनोज जरांगेंकडे आमदार किती? बबनराव तायवाडे यांचा प्रश्न
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला, पुण्यात शेतकऱ्यांना जोरदार धक्काबुक्की अन् राडा
सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला, पुण्यात शेतकऱ्यांना जोरदार धक्काबुक्की अन् राडा
Raju Patil on Shinde Faction: मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला;  50 खोके घेत फुटले, गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे; राजू पाटलांचा हल्लाबोल
मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला; 50 खोके घेत फुटले, गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे; राजू पाटलांचा हल्लाबोल
Nashik Crime : बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केलं, इन्स्टाग्रामवर मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो शेअर केला, बदनामी झाल्यानं नाशिकमधील अल्पवयीन मुलीनं गळ्याला लावला दोर
बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केलं, इन्स्टाग्रामवर मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो शेअर केला, बदनामी झाल्यानं नाशिकमधील अल्पवयीन मुलीनं गळ्याला लावला दोर
Israel : गाझा पट्ट्यात इस्त्रायलचा नरसंहार; हाॅस्पिटलवरही बाॅम्ब टाकण्याची मालिका सुरुच, 3 पत्रकारांसह 15 जणांचा जीव गेला
गाझा पट्ट्यात इस्त्रायलचा नरसंहार; हाॅस्पिटलवरही बाॅम्ब टाकण्याची मालिका सुरुच, 3 पत्रकारांसह 15 जणांचा जीव गेला
Mahayuti : प्रभागरचनेवरुन महायुतीत वादाची ठिणगी,नवी मुंबईत भाजपची नाराजी,अजितदादांच्या राष्ट्रवादीची पुण्यात कोंडी, महायुती- मविआचे नेते काय काय म्हणाले?
प्रभागरचनेवरुन महायुतीत वादाची ठिणगी, नवी मुंबईत भाजपची नाराजी, पुण्यात दादांच्या राष्ट्रवादीची कोंडी  
Embed widget