एक्स्प्लोर

RTMNU : नागपूर विद्यापीठाचे वरातीमागून घोडे; दोन महिन्यांनंतर पाठविला नवा अभ्यासक्रम

विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असताना नवा अभ्यासक्रम (syllabus changed) पाठवून त्यानुसार शिकविण्याचे आदेश काढण्यात आले आहे.

नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंद मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवेशाची प्रक्रिया संपून बराच कालावधी उलटला आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असताना नवा अभ्यासक्रम (syllabus changed) पाठवून त्यानुसार शिकविण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे महाविद्यालये हैराण झाली असून विद्यापीठाचे वरातीमागून घोडे येत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

विद्यापीठाद्वारे यंदा महाविद्यालयस्तरावर प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रिया (first year admission process) राबविण्यात आली. त्यानुसार जुलै महिन्यात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष वर्गास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे प्राध्यापकांच्यावतीने बहुतांशी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. मात्र, काही विषयांमध्ये अभ्यासमंडळाद्वारे तयार करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम महाविद्यालयातील प्राचार्यांना पाठविण्यात आला. याशिवाय हे अभ्यासक्रम तत्काळ प्रभावाने राबविण्याचे आदेशही देण्यात आले. त्यामुळे प्राध्यापक आणि प्राचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नव्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करून शिकवायचे कसे? आणि जे शिकविले, त्याचे काय? असे अनेक प्रश्न प्राध्यापकांना पडले आहेत. दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

परीक्षा लांबण्याची शक्यता?

नव्वद दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर परीक्षांना (Exams) सुरुवात करण्यात येते. त्यानुसार विद्यापीठाद्वारे प्रथम सत्राच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये (First Semester in october) घेण्यावर भर आहे. त्यामुळे अशावेळी अचानक अभ्यासक्रमात बदल करीत तो शिकविण्यास सांगितल्यास विद्यार्थी कोणत्या आधारावर परीक्षा देणार ? हा प्रश्न आहे. दुसरीकडे प्रश्न नेमके कोणत्या अभ्यासक्रमानुसार काढायचे हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे परीक्षाही लांबण्याची शक्यता आहे.

संदर्भग्रंथांचे काय?

प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी संदर्भग्रंथाची (books for reference) गरज पडत असते. मात्र, सध्या नव्या अभ्यासक्रमानुसार आवश्यक असलेली संदर्भग्रंथ वा पुस्तके उपलब्ध आहेत का? हा ही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नेमके शिकविण्यावर मर्यादा (will affect teaching) येण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाचे प्रवेशद्वार सहा तास अडवले

नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी तब्बल सहा तास विद्यापीठाचे प्रवेशद्वारे अडवून ठेवले. विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ, वसतिगृहात दुसऱ्या पदवीला प्रवेश नाकारणे, व्यायामशाळा सेवा विद्यार्थ्यांना निशुल्क उपलब्ध करुन देणे आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर धरणे दिले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

MahaRERA: कायद्यात 'ही' तरतूद नसल्याने प्रकल्प रद्द करण्यास विकासकाला परवानगी; महारेराचा मोठा निर्णय

India vs Australia Nagpur : सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच 'सोल्ड आऊट', सोशल मीडियावर 'ब्लॅक' मध्ये विक्री जोरात

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget