एक्स्प्लोर

नागपुरात तडीपार गुंडाकडून तरुणाची हत्या

ज्या गुन्हेगारांना कायद्याने नागपूरपासून दूर ठेवण्याचे आदेश दिले जर तेच गुन्हेगार नागपुरात नागरिकांचे मुडदे पाडत असतील, शहराला रक्तरंजित करत असतील तर तुम्ही काय म्हणणार. नागपुरात सध्या असंच काही घडत आहे. नागपुरात ज्या गुंडाला कायद्याद्वारे दोन वर्षांसाठी नागपुरातून तडीपार करण्यात आलं होतं, त्याच गुंडाने एका तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

नागूपर : नागपुरात तडीपार गुंडाने शहरातील तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (22 जून) रात्री क्वॉर्टर परिसरात शाहू गार्डनजवळ गौरव खडतकर नावाच्या तरुणाची हत्या झाली. कार्तिक चौबे असं आरोपीचं नाव असून तो दोन वर्षांसाठी नागपुरातून तडीपार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव रात्री उशिरा आपल्या दोन मित्रांसोबत शाहू गार्डनजवळ बसलेला होता. तिघे मित्र मद्यपान करताना त्यांचे कार्तिक चौबे नावाच्या तडीपार गुंडासोबत वाद झाले. पूर्ववैमनस्याचा राग काढत कार्तिक चौबेने त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांच्या मदतीने गौरववर हल्ला चढवला आणि दगड-लाकडी फळीने मारुन त्याला गंभीर जखमी केले. वस्तीतील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी गौरवला रुग्णालयात नेलं. मात्र, उपचाराआधीच गौरवचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेनंतर मुख्य आरोपी कार्तिक चौबेला अटक केली असून तो कागदोपत्री नागपुरातून तडीपार असल्याचे मान्य केले आहे. तडीपार असून ही कार्तिक चौबे राजरोसपणे नागपुरातच कसा राहत होता याबद्दल पोलिसांनी काहीच उत्तर दिलेलं नाही. या घटनेतील इतर आरोपी शहाबाज उर्फ बाबू आणि साहिल उर्फ राजा हे दोघेही गुन्हेगारी वृत्तीचेच असून त्यांनाही अटक करण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊन उघडल्यापासून नागपुरात गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असून जून महिन्यात आतापर्यंत हत्येच्या तेरा घटना घडल्या आहेत. तर हत्येच्या प्रयत्नांच्या घटनाही मोठ्या संख्येने घडल्या आहेत. संतापजनक बाब म्हणजे ज्या गुन्हेगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून पॅरोलवर सोडण्यात आले आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळेही नागपुरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.

पॅरोलवर सुटलेल्या किंवा तडीपार केलेल्या गुन्हेगारांनी नागपुरात केलेले गंभीर गुन्हे - 

1) यशोधरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत फुकटनगर परिसरात 3 जूनच्या रात्री अन्नू ठाकूर या सराईत गुन्हेगाराची प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांनी हत्या केली होती. मृत अन्नू ठाकूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधून पॅरोलवर सुटून बाहेर आला होता.

2) पारडी परिसरातील आठवडी बाजारात बाल्या वंजारी या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली होती. बाल्या वंजारीला पोलिसांनी नागपूर शहरातून तडीपार देखील केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो शहरात परत आला आणि पारडी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळेच अनेकांशी वाद होऊन त्याची हत्या झाली होती.

3) अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत ट्रस्ट लेआऊटमध्ये कुख्यात गुन्हेगार सतीश चन्नेने एका तरुणीची छेड काढली आणि विरोध करणाऱ्या तिच्या भावाला गंभीर जखमी केले होते. धक्कादायक बाब म्हणजे कुख्यात सतीश चन्ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून पॅरोलवर सुटून बाहेर आला होता.

4) 17 जूनच्या रात्री कळमना पोलिस स्टेशनच्या हद्दीत नितेश पटले या गुंडाची प्रतिस्पर्धी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. नितेश पटले हा कोरोनामुळे तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता.

5) नागपुरातून तडीपार करण्यात आलेल्या आरोपीने 19 जूनच्या रात्री वाठोडा परिसरात मोहित ठाकरे या तरुणाला धारधार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले होते.

6) शाहू गार्डनजवळ गौरव खडतकर या तरुणाची तडीपार गुंड कार्तिक चौबेकडून हत्या

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget