एक्स्प्लोर

महाराष्ट्रात 135 कोटींचा जीएसटी घोटाळा, बनावट बिलं सादर करुन सरकारी तिजोरीला चुना

केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाच्या जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने महाराष्ट्रात वस्तू व सेवा कर चुकवेगिरीचा एक मोठा घोटाळा शोधून काढला आहे

नागपूर : अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या खोट्या विक्रीचे बनावट देयके सादर करून सरकारी तिजोरीला तब्बल 135 कोटींचा चुना लावल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने म्हणजेच डिजीजीआयच्या नागपूर झोनल युनिटने हा 'जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडीत घोटाळा' उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे भंडारा पासून नंदुरबारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बनावट देयकांच्या आधारे खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय असून घोटाळा करणाऱ्या तथाकथित 22 कंपन्यांपैकी एकाच्या म्होरक्याला नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथून अटक करण्यास डिजीजीआय ला यश आले आहे तर इतरांचे शोध घेतले जात आहे.

जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून संपूर्ण देशासाठी एक सारखी कर रचना प्रणाली लागू करण्यात आली. त्यामागे अप्रत्यक्ष कर रचना सोपी करणे आणि कर चोरी पकडणे हे उद्दिष्ट होते. केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाच्या जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने महाराष्ट्रात वस्तू व सेवा कर चुकवेगिरीचा एक मोठा घोटाळा शोधून काढला आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या बनावट देयकांच्या मदतीने खरेदी विक्रीचे खोटे व्यवहार कागदोपत्री उभे करणे, त्यांचे आपापसात चक्रीय पद्धतीचे व्यवहार दाखविणे आणि त्या आधारे जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडीत मिळविणे असे या घोटाळ्याचे स्वरूप आहे. तज्ज्ञांच्या मते जीएसटी कायद्यात वस्तूची विक्री एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला होत असताना विक्री करणाऱ्या कंपनीला विक्रीच्या बिलात समोरच्या कंपनीकडून (खरेदी करणाऱ्या कंपनी कडून) जीएसटीची आकारणी करत पुढे स्वतःच्या जीएसटी कारभारात सूट म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडीट मिळवता येते.

महाराष्ट्रात घडलेल्या या घोटाळ्यात हेच इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी खोट्या कंपन्या, त्यांची खोटी विक्री देयके वापरण्यात आली. डिजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार ज्या 22 कंपन्यांनी हा घोटाळा केला आहे. त्या भंडारा, नागपूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक धुळे आणि नंदुरबार मधील असून या 22 कंपन्यांनी जीएसटीचे 135 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी तब्बल 1 हजार 83 कोटीचे बनावट विक्री व्यवहार दाखविले आहे. एवढेच नाही तर या सर्व 22 कंपन्याचे कागदोपत्री अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांचे खोटे पत्ते, खोटी वीजबिले वापरण्यात आली. त्यासाठी घोटाळेबाजानी भंडारा ते नंदुरबारपर्यंत हेतुपुरस्सर ग्रामीण भागालाच निवडले.

तज्ज्ञांच्या मते असे खोटे व्यवहार दाखवत जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या सोयीचा गैरफायदा घेणारे एका राज्यापुरते मर्यादित नाहीत, ते आंतरराज्य व्यवहार करतात. त्यामुळे जरी नागपूरच्या डिजीजीआय युनिटने महाराष्ट्रातून केवळ 22 कंपन्यानी केलेला 135 कोटींचा घोटाळा शोधून काढला असला तरी हे हिमनगाचे फक्त टोक आहे. याची खरी व्याप्ती शोधण्यासाठी प्रत्येक राज्यात असलेल्या जीएसटी युनिट्सने आपापल्या कार्यक्षेत्राची मर्यादा बाजूला सारून एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे. तसे झाल्यास करचुकवेगिरीचा हा घोटाळा खूप मोठा असू शकतो.

महाराष्ट्रात ज्या 22 कंपन्यांनी 135 कोटींचा चुना सरकारला लावला आहे. त्या सर्व सुताचे (सिल्क यार्न, वुलन यार्न, कॉटन यार्न ) व्यवहार करणाऱ्या असल्याचे दाखवत घोटाळा करण्यात आला आहे. त्यामुळे जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी इतर व्यवसायात लक्ष घातल्यास य घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी असण्याची दाट शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget