एक्स्प्लोर

Mumbai News: फेरीवाल्यांचं अतिक्रमण हटवण्यात अडचण काय? हायकोर्टानं मागितलं मनपाकडून स्पष्टीकरण

Mumbai News: बोरीवली स्थानकाबाहेरील दुकांनासमोर काही फेरीवाले बसतात. त्यांच्यामुळे रहदारीसाठी लोकांना रस्ता राहत नाही. या फेरीवाल्यांना हटवावं, अशी मागणी करत काही दुकानदारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

Mumbai News: मुंबई : मुंबईकरांना (Mumbai News) चालण्यासाठी मोकळे फुटपाथ (Footpath) देता येत नसतील तर त्यांच्यासाठी नवे फुटपाथ तयार करा. असा उपरोधिक टोला हायकोर्टानं (High Court) लगावलाय. पदपथांवरून केवळ लोकांनाच चालता येईल, असं नियोजन पालिकेनं करायला हवं. किमान प्रायोगिकतत्त्वार हे नियोजन पालिकेनं करायलाच हवं, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) महापालिकेला केली आहे. फेरीवाल्यांना कायमस्वरुपी हटवण्यात तुम्हाला नेमक्या काय अडचणी आहेत? याची माहिती सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं पालिकेला दिले आहेत.

कोणत्याही उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बाहेर चाललायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. ठिकठिकाणी फेरीवाले बसलेले असतात. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यावर जाताना मुंबईकरांना कसरत करावी लागते. अशी नाराजी या सुनावणीत हायकोर्टानं व्यक्त केली.

पालिका प्रशासन सतत फेरीवाल्यांना हटवते. पण ते पुन्हा तिथं येऊन बसतात, असे पालिकेच्यावतीनं जेष्ठ वकील एस. यू. कामदार यांनी कोर्टाला सांगितलं. फेरीवाले कारवाई करुनही पुन्हा येत असतील तर पालिका अधिकाऱ्यांनी यावर कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा. कारण मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथच उरले नसल्यानं त्यांना नाईलाजानं रस्त्यावर चालावं लागतं. मग रस्त्यावर चालताना अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असे खडेबोलही हायकोर्टानं सुनावले.

काय आहे प्रकरण?

बोरीवली स्थानकाबाहेरील दुकांनासमोर काही फेरीवाले बसतात. त्यांच्यामुळे रहदारीसाठी लोकांना रस्ता राहत नाही. या फेरीवाल्यांना हटवावं, अशी मागणी करत काही दुकानदारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत हायकोर्टानं याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली. न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई महापालिका ही मुंबईतील पायाभूत सुविधांचं नियोजन करते. फेरीवाला क्षेत्र निश्चित करणं, फेरीवाल्यांना परवाना देणं, त्यांचं अतिक्रमण रोखणं ही पालिकेची जबाबदारी असतानाही सर्वच पदपथांवर फेरीवाले कसे दिसतात? या फेरीवाल्यांचं नियोजन करण्यासाठी तुमच्या अधिकाऱ्यांकडे काही तोडगा कसा नाही?, असा सवाल हायकोर्टानं पालिकेला विचारलाय. यावरील पुढील सुनावणी 1 मार्च रोजी होणार आहे.

आज मुंबईत अनेक ठिकाणी इमारत व दुकानांसमोर फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे इमारत व दुकानात जाण्यासाठी मार्गच उरत नाही. इमारतीतील रहिवाशांना व दुकानदारांनाही याचा नाहक त्रास होतो. काही भागात ना फेरीवाला क्षेत्रातच अनधिकृत फेरीवाले बसतात, ही परिस्थिती बदलायला हवी. ज्या दिवशी दुकाने बंद असतील तेव्हा फेरीवाल्यांना तिथं बसण्यास पालिकेने परवानगी द्यावी, असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. राज्यघटनेनं सन्मानानं जगण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. मुंबईकरांना मोकळे पदपथ मिळत नसतील तर त्यांच्या सन्मानानं जगण्याच्या अधिकारावर गदा येत नाही का?, असा संतप्त सवाल या सुनावणी हायकोर्टानं उपस्थित केला.

फेरीवाल्यांची समस्या केवळ मुंबईची नाही. न्यूयॉर्कसह अनेक देशांमध्येही फेरीवाल्यांची मोठी समस्या आहे. परदेशात ही समस्या कशी हाताळली जाते?, याचा पालिकेनं अभ्यास करायला हवा. आमचा फेरीवाल्यांना विरोध नाही. पण मुंबईकरांना चालण्यासाठी जागा शाबूत राहायला हवी. मुंबईला फेरीवाल्यांचा इतका विळखा बसला आहे की शहरात फुटपाथच राहिलेली नाही. मुंबईकरांना वाहतुकीच्या रस्त्यावर चालण्यासाठी तुम्ही भाग पाडता, असं स्पष्ट मत हायकोर्टानं या सुनावणी दरम्यान व्यक्त केलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget