एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : महाराष्ट्रात यांना रोखणारी शिवसेनाच, ती संपत नाही म्हटल्यावर चोरायला निघाले; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका 

Shivsena : हिंदुत्वाचा मक्ता काही एकट्या भाजपनं घेतलेला नाही, शिवसेना शिल्लकच ठेवायची नाही हा भाजपचा अजेंडा आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

मुंबई: बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर यांनी शिवसेना (Shivsena) संपवायचा घाट घातला, कारण महाराष्ट्रात यांना कुणी जर रोखणारं असेल तरे ती शिवसेना आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली. आता तर शिवसेना संपत नाही म्हटल्यावर ती चोरायला निघालेत असंही ते म्हणाले. पंतप्रधानांनी 10 वर्षात काय केलं? शेतकरी, शिक्षक, नोकरदार, विद्यार्थी यांना काय मिळालं? शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

भाजपवाले सगळं उचलून गुजरातला नेणार. राख इकडे, रांगोळी तिकडे असा सगळा प्रकार सुरू आहे. त्याचमुळे सगळे उद्योग तिकडे नेतायत आणि कोकणला बरबाद करणारी रिफायनरी इकडे आणतायत. महाराष्ट्रात जर कुणी यांना रोखणार असेल तर ती फक्त शिवसेना आहे, दुसऱ्या कुणाच्यात हिंमत नाही. त्यामुळेच ते आम्हाला संपवायला निघालेत. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, वय वाढत असत, ज्याक्षणी मन थकेल त्यावेळी माणसं वृद्ध होतात, पण माझ्यासमोरचे शिवसैनिक हे ज्येष्ठ नाही तर युवासैनिक आहे. इथल्या घोषणा बघून वाटतंय की पुन्हा एकदा दसरा मेळाव्यात आलोय की काय? शिवसेना नावाचा ग्रंथ अजुनही लिहिला जातोय, तुमच्यासारखी पानं नसती तर तो केव्हाच थांबला असता. आमचं लहानपण तुमच्यासोबतच गेलंय. आम्ही अरे तुरे करायचो पण हे सगळे वयानं मोठे. 

शिवसेनेसमोर सध्या संकट नाही तर संधी आहे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. शिवसेनेला संपवायला जे उभे आहेत त्यांच्यात आणखी कुणाला जायचंय त्यांनी जा. शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी शिवसेनेला आलेली फुलं तोडून  नेली पण माझी मूळं घट्ट आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

अटलबिहारी वाजपेयींची आठवण

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासंबंधिची एक आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा अटलजींचं 13 दिवसांचं सरकार होतं तेव्हा अटलजींचा बाळासाहेबांना फोन आला. अटलजी म्हणाले मी तुम्हाला मंत्रीपद एकच देऊ शकतो. तेव्हा बाळासाहेब म्हणाले एकही देऊ नका तुम्ही आधी खुर्चीत बसा. 

युती भाजपने तोडली

उद्धव ठाकरे म्हणाले की, 2019 ला खडसेंचा अचानक फोन आला, आपलं  जमेल असं वाटत नाही म्हणाले. थोड्याफार जागांचा प्रश्न होता. चर्चेतून सोडवू असं म्हणालो पण तरी युती तोडली. आता आम्ही काँग्रेस सोबत बसलो. सन 2014 ला संपवायला निघाले, 2019 ला गद्दारी करुन युती तोडली. हिंदुत्वाचा मक्ता काही एकट्या भाजपनं घेतलेला नाही. शिवसेना शिल्लकच ठेवायची नाही हा भाजपचा अजेंडा आहे. जर हे मूळावरच आले असतील तर मी वागतोय ते चूक की बरोबर? जर मला मुख्यमंत्रीपदाची हाव असती तर मी एका मिनिटात वर्षा सोडून मातोश्रीवर गेलो नसतो. 

मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवेन. भाजपकडून वचन पाळलं गेलं असतं तर हरकतच नव्हती. आताही एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार आणि हा माझा शब्द आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget