एक्स्प्लोर

TRP Scam Case | अर्णब गोस्वामींच्या याचिकेवर हायकोर्टात नियमित सुनावणीला सुरुवात, अंतरिम दिलासा तूर्तास कायम

एखाद्या कंपनीविरोधात घोटाळ्यात सामिल असल्याचा आरोप कसा होऊ शकतो?, कुठलेही सबळ पुरावे नसल्यानं एआरजी मीडियाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला आरोपी बनवण्यात आलेलं नाही. केवळ आपल्या सोयीनुसार चौकशीला बोलावून छळण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोपही अर्णब यांच्यावतीनं करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबई : कथित टीआरपी घोटाळ्याचं सारं कुंभाड हे केवळ अर्णब गोस्वामी यांना गोवण्यासाठीच रचण्यात आलं आहे. असा दावा रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या वतीनं हायकोर्टात करण्यात आला आहे. तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या जवळ असलेले आणि मुंबई पोलिसांचे सध्या चर्चेत असलेले अधिकारी सचिन वाझे यांना या प्रकरणाची जून 2020 पासून माहिती होती. मात्र तरिही त्यांनी पुढचे काही महिने काहीच कसं केलं नाही?, असा सवाल करत टीआरपी घोटाळ्याचे प्रभारी तपास अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले आहेत.

त्याचबरोबर एखाद्या कंपनीविरोधात घोटाळ्यात सामिल असल्याचा आरोप कसा होऊ शकतो?, कुठलेही सबळ पुरावे नसल्यानं एआरजी मीडियाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला आरोपी बनवण्यात आलेलं नाही. केवळ आपल्या सोयीनुसार चौकशीला बोलावून छळण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोपही अर्णब यांच्यावतीनं करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही काही संशयास्पद विधानं केली होती. याप्रकरणी तक्रार कशी आली हे स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. मात्र बार्कनं आपल्या अहवालात याचा कुठेही उल्लेख केला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मंगळवारपासून मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर अर्णब गोस्वामी यांच्यावतीनं जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी आपला युक्तिवाद सुरु केला आहे. उद्याही यावर युक्तिवाद सुरु राहील, त्यामुळे पुढील निर्देश येईपर्यंत अर्णब गोस्वामी आणि या एआरजी मीडियाच्या इतर कर्मचाऱ्यांना अटकेपासून दिलेलं अंतरिम संरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. 

पालघरमधील साधूंची जमावाकडनं झालेली हत्या, कंगाना रणौत प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण या मुद्यांवर राज्य सरकारवर सडकून टिका केल्यामुळेच अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हा सारा बनाव रचल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार हायकोर्टात करण्यात आला आहे. त्यामुळे या कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णबसह एआरजी आऊटलेअर समुहानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तेव्हा, पोलिसांच्या आरोपपत्राला प्रत्युत्तर म्हणून एआरजी कंपनीने हायकोर्टात 3 हजार पानी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देत तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे चौकशीसाठी देण्याची मागणी करत एआरजी मीडियानं गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Kurla : कुर्ल्यात मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया; उच्चस्तरीय चौकशीसाठी नगरसेवक आक्रमक
कुर्ल्यात मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया; उच्चस्तरीय चौकशीसाठी नगरसेवक आक्रमक
Mumbai Police On Pranit More Controversy: प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
Prasad Vedpathak: सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!

व्हिडीओ

Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Embed widget