एक्स्प्लोर

आधी हात जोडून बोलू, मग हात सोडून बोलू; विद्यार्थी पालक समन्वय समितीच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सरकारला इशारा

गेल्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालक आणि विद्यार्थ्यांनी भेट घेतली. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी फीवाढीचा मुद्दाही राज ठाकरे यांच्यासमोर मांडला.

मुंबई : विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज कृष्णकुंजवर जाऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. यासंदर्भात आज विद्यार्थी पालक समन्वय समितीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. जिम व्यवस्थापक, ग्रंथालयाचे संस्थापक, कोळी महिला, मुंबईचे डब्बेवाले आणि मूर्तिकार यांच्यापाठोपाठ आता विद्यार्थी-पालक समन्वय समितीनेही आपल्या समस्या मांडण्यासाठी कृष्णकुंज गाठलं आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालक आणि विद्यार्थ्यांनी भेट घेतली. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी फीवाढीचा मुद्दाही राज ठाकरे यांच्यासमोर मांडला. यावर राज ठाकरे यांनी तातडीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन करून याबाबत निर्णय घ्यावा, असं सांगितलं. याबाबत लवकरच शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा सरकार काढत असून आपण पुन्हा एकदा वर्षा गायकवड यांच्याशी यासंदर्भात चर्चा करू, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे रखडलेले 11वी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरु व्हावी हीच अपेक्षा पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

शाळेत वसूल केली जाणारी फी आणि शाळेच्या मनमानी कारभाराबाबत मुंबईतील शाळेत शिक्षक घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शाळेकडून मनमानी कारभार सुरु असून शाळा फी द्ययाला सुद्धा नकार देत असल्याचे पालकांनी राज ठाकरे यांना सांगितलं. यावर आधी आपण सरकारशी हात जोडून बोलू नाहीतर मग हात सोडून बोलू, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी पालकांना दिलं आहे.

पाहा व्हिडीओ : विद्यार्थी-पालक समन्वय समिती राज ठाकरे यांच्या भेटीला

विद्यार्थी पालक समन्वय समितीसोबतच लॉकडाऊनपासून मागील 8 महिन्यांपासून बंद असलेले छोटे मोठे कोचिंग क्लासेस सुरु करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस मालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शाळा बंद आहेत तरी शिक्षकांचा पगार सुरु आहे, मात्र कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणारे शिक्षक पूर्णपणे बेरोजगार झाले असून कोचिंग क्लासेस सुरु करून ज्ञान देण्याचं काम सुरु करु द्यावं, ही मागणी महाराष्ट्र कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि सरकरच्या इतर मंत्र्याशी बोलून ही मागणी मान्य करू असं आश्वासन राज ठाकरे यांनी या कोचिंग क्लासेस मालकांना दिलं आहे.

वाढीव वीज बिलाबाबत राज्यपालांना निवेदन; शरद पवार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेईन : राज ठाकरे

राज्यातील जनतेला येत असलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली होती. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनीही माहिती दिली होती.

वीजबिलांचा विषय मनसे लावून धरत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं करत आहे. अदानी, वेस्टची लोकं भेटली. आम्ही बिल कमी करु शकतो मात्र एनईआरसी कमी करावा लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते सांगतात. परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यपालांशी बोललो, ते म्हणाले शरद पवारांचा सल्ला घ्या. मी शरद पवारांना भेटणार आहे. हा विषय राज्य सरकारला माहित आहे, मग हे प्रकरण कशात अडकलंय हे कळत नाही. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याच संदर्भात पहिलं निवेदन राज्यपालांना भेटून दिलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
Mumbai Rajbhavan : खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget