नारायण राणेंचं आत्मचरित्र केवळ दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी, शिवसेना आमदार वैभव नाईकांचा आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. नारायण राणेंनी शिवसेना का सोडली यामागचं खरं कारण आत्मचरित्रात आहे.

मुंबई : नारायण राणेंनी आत्मचरित्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना नेत्यांकडून राणेंनी आत्मचरित्रातून केलेले आरोप खोडून काढले जात आहे. तर सिंधुदुर्गमधील शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी थेट नारायण राणेंवर आरोप करत त्यांना उलट प्रश्न केले आहेत.
नारायण राणेंचं आत्मचरित्र हे केवळ दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी आहे. मात्र स्वत:वर झालेल्या आरोपाचं काय? त्याचं स्पष्टीकरण आत्मचरित्रात का नाही? असा सवाल आमदार वैभव नाईकांनी विचारला आहे. श्रीधर नाईक हत्या प्रकरण, चेंबूरमधील गुन्हे, कोकणातील गुन्हे यावर राणेंनी आत्मचरित्रात स्पष्टीकरण का नाही दिलं? अशी विचारणा वैभव नाईक यांनी केली.
नारायण राणेंच आत्मचरित्र हे फक्त प्रसिद्धीसाठी आहे. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करून काही फायदा नाही. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सक्षम आहे. नारायण राणे पक्षातून गेल्यावर कोकणातून जास्त आमदार निवडूण आले होते, याची आठवण वैभव नाईकांनी करुन दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. आत्मचरित्रांतून अनेक गुपितं उघड करण्याचे संकेत आधीच राणेंनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिले होते.
नारायण राणेंनी आत्मचरित्रातून केलेल्या आरोपात तथ्य नाही : मनोहर जोशी
नारायण राणेंनी 1972 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात नारायण राणेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. आघाडीची सत्ता असताना 2005 साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.
VIDEO | नारायण राणेंच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेसंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट | एबीपी माझानारायण राणेंनी आत्मचरित्रांत काय म्हटलं आहे?
'राणेंना पक्षात ठेवलंत, तर मी घर सोडेन, असं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना सांगितलं होतं. शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी आपल्याला बोलावलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना स्पष्ट सांगितलं होतं, की राणेंना पक्षात ठेवलं तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ', असा दावा राणेंनी केला आहे.
शिवसेना का सोडली यामागचं खरं कारण आत्मचरित्रात आहे. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला, ते या चरित्रात लिहिलं आहे, असंही नारायण राणेंनी सांगितलं होतं. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्व पक्षांमधील प्रवास लिहिल्याचं नारायण राणेंनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण राणेंनी दिलं होतं.
Narayan Rane | काय सांगतात नारायण राणेंचे ग्रहतारे? | ग्रहताऱ्यांच्या गल्लीतून दिल्ली | ABP MajhaBefore You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?





















