एक्स्प्लोर

शरद पवारांची मध्यस्थी आणि शिवसेनेची मनधरणी

मुंबईतल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमुळे शिवसेना नाराज होती आणि बदल्या रद्द केल्यामुळे राष्ट्रवादी नाराज झाली, म्हणून शरद पवार यांनी मध्यस्थी करत उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची भेट घडवून आणली.

मुंबई : शरद पवार आणि अनिल देशमुख यांनी काल (6 जुलै) मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल एक तास चर्चा झाली आणि या बैठकीत एकमेकांबद्दल झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचं कळतंय. मुंबईत नुकत्याच झालेल्या पोलीस दलाच्या बदल्यांवरुन महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचं सर्वांसमोर उघड झालं. मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंह यांनी बदल्या केल्या पण त्या काहीच दिवसांत रद्द करण्यात आल्या. त्यानंतर या बदल्या का रद्द केल्या? बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे बदल्यांमुळे शिवसेना नाराज होती आणि बदल्या रद्द केल्यामुळे राष्ट्रवादी नाराज झाली म्हणून शरद पवार यांनी मध्यस्थी करत उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची भेट घडवून आणली.

भेटीत काय घडलं? शरद पवार यांनी या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना समोरासमोर बसवून गैरसमज दूर केले. मुंबईतल्या बदल्या रद्द केल्याने शिवसेना चांगलीच संतापली होती. गृहखातं राष्ट्रवादीकडे असताना मुंबईतले जे काही बदल असतील ते शिवसेनेला विश्वासात घेऊन करावे, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. तर पोलीस आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला आहे असं वाटल्याने या बदल्यांना हिरवा कंदील दिल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. तसंच यापुढे कोणत्याही बदल्या करण्याआधी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं जाईल अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.

अजित पवारांबद्दल नाराजी या मुद्द्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आपण चुकीचा संदेश बाहेर देत आहोत. महाविकास आघाडी म्हणून काम करताना असे पक्षप्रवेश करणं चुकीची असल्याचं सांगण्यात आलं. या बैठकीआधीच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांना पाच नगरसेवक परत शिवसेनेत पाठवा, असा मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला होता. शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत घेताना शिवेसेनेशी संवाद का साधाला गेला नाही? असा सवाल शिवसेनेने विचारला.

मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांची बैठक मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई पोलीस कमिश्नर परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली. या बैठकी मातोश्रीवर काय काय घडलं तसंच पुढे काम करताना शिवसेनेशी कसा समन्वय ठेवायचा आहे याबाबत चर्चा झाली.

सरकार स्थापन झाल्यापासून या तीन पक्षांमध्ये अनेकवेळा खटके उडाले आहेत. पाहूया आतापर्यंत काय काय घडलं आहे?

1. खाते वाटपावरुन मंत्रिमंडळाला उशीर

2. सावरकरांच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांची राहुल गांधींवर टीका

3. अब्दुल सत्तार, विजय वड्डेटीवार, छगन भुजबळ मंत्रिपदावरुन नाराज

4. भीमा कोरेगांवचा तपास NIA दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज (मल्लिकार्जुन खर्गेनी आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती )

5. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेद्र मोदी, अमित शाह आणि सोनिया गांधीची भेट घेतली त्यानंतर CAA वर जाहीर केलेल्या भूमिकेवरून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि संजय निरुपम यांनी टीका केली होती.

6. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षण जाहीर केलं त्यानंतर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती

7. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेच्या रिंगणात असताना काँग्रेसचा अधिक एका जागेचा आग्रह होता, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता.

8. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु दोघांचाही 5 जागांचा आग्रह

9. लॉकडाऊन वाढवल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस नाराज

10. मुंबईतल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत खटके उडाले

संबंधित बातम्या

CM Thackeray Meet | पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द, पवार, देशमुख, ठाकरेंमध्ये याबाबत चर्चा?

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!

व्हिडीओ

India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget