एक्स्प्लोर

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना खात्यातून हजार रुपयेच काढता येणार

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर पीएमसी बँकेचे ठेवीदार आता फक्त एक हजारापर्यंतच आपल्या ठेवी काढू शकत आहेत. आज अचानक सकाळपासून पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

मुंबई : पीएमसी म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार आजपासून बंद करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने 35A अंतर्गत पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार पुढील सहा महिन्यासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहे. बँक डबघाईला आल्यामुळे पीएमसी बँकेचे पुढील व्यवहार सुरु ठेवण्यास आरबीआयने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्यभरातील चिंताग्रस्त ग्राहकांनी बँकांच्या बाहेर गर्दी केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांना आता तीन महिन्यातून एकदा फक्त एक हजारापर्यंतच्या ठेवी काढता येणार आहेत,  अशी माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. आज अचानक सकाळपासून पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी बँके बाहेर ग्राहकांचा गोंधळ पाहायला मिळत आहे.

पुढील 6 महिन्यात याबाबत योग्य तो मार्ग काढणार असल्याचं पीएमसी बँक व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शिवाय ग्राहकांनी याबाबत काळजी करू नये, असंही पीएमसी बँकने ठेवीदारांना सांगितलं. बँकेचा एनपीए वाढणे, बँकेची गुंतवणूक धोक्यात येणे, वाढती बुडीत कर्ज ही पीएमसी बँक संकटात येण्याची मुख्य कारणे असल्याचं बँकिंग तज्ज्ञांचं मत आहे. पीएमसी बँकेला याआधीही रिझर्व्ह बँकेने नोटीस पाठवल्या होत्या. मात्र तरीसुद्धा बँकेचा अकार्यक्षम कारभारामुळे ही वेळ बँकेवर आल्याच बोललं जात आहे.

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईमुळे बँकेला परवानगीशिवाय नवीन कर्ज देत येणार नाही, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही, कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, तसेच नव्या ठेवीही स्वीकारता येणार नाहीत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असणार आहेत.

बँकेच्या अशा अडचणीच्यावेळी रिझर्व्ह बँक राज्य शासनाच्या परवानगीने एक प्रशासक सहा महिन्यांसाठी येथे नेमते. बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. बँकेची स्थिती सहा महिन्यात सुधारली की पुन्हा वाढीव तीन महिन्याची मुदत बँकेला दिली जाते.

कोल्हापुरातही पीएमसी बँकेत ग्राहकांचा गोंधळ

कोल्हापुरातही पीएमसी बँकेत ग्राहकांचा प्रचंड गोंधळ पाहायल मिळत आहे.ग्राहकांना पैसे मिळत नसल्याने ते बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारला करत आहेत. ग्राहकांचा गोंधळ पाहून बँकेचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ग्राहक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

डोंबिवलीत ग्राहकांचा बँकेत घुसण्याचा प्रयत्न

डोंबिवलीच्या पीएमसी बँकेबाहेर प्रचंड गर्दी करत बँकेत घुसण्याच प्रयत्न केला. जवळपास दीड ते दोन हजार खातेधारक बँकेबाहेर जमले होते. खबरदारीचा उपाय म्हणून बँकेच्या दारावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बँक बुडालेली नाही, सर्वांचे पैसे परत मिळतील असं बँक व्यवस्थापनाकडून सांगितलं जात आहे.

पालघरमध्ये बँक मॅनेजरला घेराव पालघर येथील पीएमसी बँकेच्या शाखेत खातेधारकांचा बँकेच्या मॅनेजरला घेराव घातला. आमचे पैसे आम्हाला मिळणार नसतील तर आम्ही करायचे काय असा सवाल उपस्थित करत खातेधारकांनी बँकेत गोंधळ घातला. खातेधारकांना 3 महिन्यात 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत, असं बॅंकेकडून सांगण्यात आलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Embed widget