एक्स्प्लोर

आमच्या मिशीला कुणाचं खरकटं नाही: राजू शेट्टी

मुंबई: आमच्या मिशीला कुणाचं खरकटं लागलेलं नाही. आम्ही कुणाच्याही मिंद्यात नाही. जिथं-जिथं चूक असेल, तिथे सरकारविरोधी भूमिका घेऊन स्वाभीमान दाखवू. शिवाय आमचं चुकलेलं लेकरु परत आणू, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या दुराव्याबाबत भाष्य केलं. ते 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, तूर, कर्जमाफी, स्वाभिमानीतील अंतर्गत धुसफूस आणि आत्मक्लेश आंदोलन या सर्वांवर रोखठोक मत मांडलं. आमचा वाद वैचारिक माझ्यातला आणि सदाभाऊंमधला वाद वैचारिक आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन सरकारशी संघर्ष करताना सत्तेत राहायचं की नाही यावरुन मतभेद आहेत. पण आमचे टोकाचे मतभेद नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले. सदाभाऊंना शब्द दिला होता... "आम्ही 2004 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. सदाभाऊ खोत हे 2009 मध्ये आमच्यात सामील झाले. सदाभाऊ जेव्हा भेटले तेव्हा परिस्थितीने हताश झाले होते. मी रस्त्यावर आलोय, पुन्हा चळवळीत आलो तर वरच येणार नाही, असं म्हणत होते. पण मी त्यांना शब्द दिला, जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असाल, तोपर्यंत तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यावेळी मी आमदार होतो. जर काही झालंच असतं, निवडणुकी हरलो असतो, तर मला मिळणाऱ्या माजी आमदाराच्या पेन्शनमधून अर्धे सदाभाऊंना देऊ, असं सांगितलं होतं. मात्र ती वेळ आली नाही", असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. सदाभाऊंनी चळवळीत दिवस काढले. त्यामुळेच मी माझ्यासाठी काहीही न मागता, माझ्या माणसासाठी मंत्रिपद मागितलं. भाजपने 3 विधानपरिषदेच्या जागा देतो असं सांगितलं होतं, मात्र एकच मिळाली. आता उरलेल्या जागा काही मिळणार नाहीत याची खात्री आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले. मोदी सरकारकडून भ्रमनिरास ज्यावेळी लोकांना आश्वासक चेहरा मिळतो, तेव्हा लोक परिवर्तनासाठी तयार होतात. मोदींच्या आश्वासक चेहऱ्याला लोकांनी पसंती दिली. मात्र मोदी सरकारकडूनही भ्रमनिरास झाला. सरकारनं आमचा अपेक्षाभंग केल्याची खदखद मनात आहेच, असं राजू शेट्टी म्हणाले. भाजपचं फसवं यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश फसवं आहे, हे यश मृगजळासारख, लोकांना पर्याय नसल्यानं भाजपला बहुमत मिळालं, असं राजू शेट्टी यांनी नमूद केलं. महायुतीने अपेक्षाभंग सरकारमध्ये असूनही आजही आमच्यावर सर्वाधिक गुन्हे आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय. आम्ही एनडीएत राहायचं नाही, याचा पुनर्विचार करु, अजून दोन वर्षं आमच्या हातात आहेत. मोदींनी अपेक्षाभंग केला आहे, दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, असंही राजू शेट्टी म्हणाले. आत्मक्लेश आंदोलन येत्या 22 तारखेपासून आमचं आत्मक्लेश आंदोलन सुरु होणार आहे. वाढलेल्या शेतकरी आत्महत्यां हे या आत्मक्लेश आंदोलनाचं मुख्य ध्येय असून, शेतकरी कर्जमुक्ती करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा या आमच्या मागण्या आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and Devendra Fadnavis: साताऱ्यातील निवडणुकीवरुन भाजप-शिंदे गटात धुसफूस, एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली?
एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा, एसपी तुषार दोशींना अभय मिळणार?
Sanjay Raut : ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Aaditya Thackeray : अशोक खरात प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची मागणी, आदित्य ठाकरेंची मागणी
अशोक खरात प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची मागणी, आदित्य ठाकरेंची मागणी

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Maharashtra Live Blog: अशोक  खरातच्या श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर, धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Live Blog: अशोक  खरातच्या श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर, धक्कादायक माहिती उघड
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Rajinikanth On Dhurandhar 2: 'धुरंधर 2'वर फिदा झाला इंडस्ट्रीचा दिग्गज, आदित्य धरला म्हणाला, 'बॉक्स ऑफिसचा बाप'; सिनेमावर स्तुतिसुमनं उधळताना म्हणाला...
'धुरंधर 2'वर फिदा झाला इंडस्ट्रीचा दिग्गज, आदित्य धरला म्हणाला, 'बॉक्स ऑफिसचा बाप'; सिनेमावर स्तुतिसुमनं उधळताना म्हणाला...
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Embed widget