एक्स्प्लोर

आमच्या मिशीला कुणाचं खरकटं नाही: राजू शेट्टी

मुंबई: आमच्या मिशीला कुणाचं खरकटं लागलेलं नाही. आम्ही कुणाच्याही मिंद्यात नाही. जिथं-जिथं चूक असेल, तिथे सरकारविरोधी भूमिका घेऊन स्वाभीमान दाखवू. शिवाय आमचं चुकलेलं लेकरु परत आणू, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या दुराव्याबाबत भाष्य केलं. ते 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, तूर, कर्जमाफी, स्वाभिमानीतील अंतर्गत धुसफूस आणि आत्मक्लेश आंदोलन या सर्वांवर रोखठोक मत मांडलं. आमचा वाद वैचारिक माझ्यातला आणि सदाभाऊंमधला वाद वैचारिक आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन सरकारशी संघर्ष करताना सत्तेत राहायचं की नाही यावरुन मतभेद आहेत. पण आमचे टोकाचे मतभेद नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले. सदाभाऊंना शब्द दिला होता... "आम्ही 2004 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. सदाभाऊ खोत हे 2009 मध्ये आमच्यात सामील झाले. सदाभाऊ जेव्हा भेटले तेव्हा परिस्थितीने हताश झाले होते. मी रस्त्यावर आलोय, पुन्हा चळवळीत आलो तर वरच येणार नाही, असं म्हणत होते. पण मी त्यांना शब्द दिला, जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असाल, तोपर्यंत तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यावेळी मी आमदार होतो. जर काही झालंच असतं, निवडणुकी हरलो असतो, तर मला मिळणाऱ्या माजी आमदाराच्या पेन्शनमधून अर्धे सदाभाऊंना देऊ, असं सांगितलं होतं. मात्र ती वेळ आली नाही", असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. सदाभाऊंनी चळवळीत दिवस काढले. त्यामुळेच मी माझ्यासाठी काहीही न मागता, माझ्या माणसासाठी मंत्रिपद मागितलं. भाजपने 3 विधानपरिषदेच्या जागा देतो असं सांगितलं होतं, मात्र एकच मिळाली. आता उरलेल्या जागा काही मिळणार नाहीत याची खात्री आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले. मोदी सरकारकडून भ्रमनिरास ज्यावेळी लोकांना आश्वासक चेहरा मिळतो, तेव्हा लोक परिवर्तनासाठी तयार होतात. मोदींच्या आश्वासक चेहऱ्याला लोकांनी पसंती दिली. मात्र मोदी सरकारकडूनही भ्रमनिरास झाला. सरकारनं आमचा अपेक्षाभंग केल्याची खदखद मनात आहेच, असं राजू शेट्टी म्हणाले. भाजपचं फसवं यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश फसवं आहे, हे यश मृगजळासारख, लोकांना पर्याय नसल्यानं भाजपला बहुमत मिळालं, असं राजू शेट्टी यांनी नमूद केलं. महायुतीने अपेक्षाभंग सरकारमध्ये असूनही आजही आमच्यावर सर्वाधिक गुन्हे आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय. आम्ही एनडीएत राहायचं नाही, याचा पुनर्विचार करु, अजून दोन वर्षं आमच्या हातात आहेत. मोदींनी अपेक्षाभंग केला आहे, दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, असंही राजू शेट्टी म्हणाले. आत्मक्लेश आंदोलन येत्या 22 तारखेपासून आमचं आत्मक्लेश आंदोलन सुरु होणार आहे. वाढलेल्या शेतकरी आत्महत्यां हे या आत्मक्लेश आंदोलनाचं मुख्य ध्येय असून, शेतकरी कर्जमुक्ती करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा या आमच्या मागण्या आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
Ashok Kharat and Anjali Damania: अशोक खरातला रुपाली चाकणकरांपेक्षाही जास्त फोनकॉल करणारा 'तो' सरकारी अधिकारी कोण; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अशोक खरातला रुपाली चाकणकरांपेक्षाही जास्त फोनकॉल करणारा 'तो' सरकारी अधिकारी कोण; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
CBSE 10th Result 2026 Declared: सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
Cameron Green: तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
Share Market : शेअर बाजारात पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांची एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
शेअर बाजारात पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांची एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
Bihar Politics: नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
Embed widget