एक्स्प्लोर

आमच्या मिशीला कुणाचं खरकटं नाही: राजू शेट्टी

मुंबई: आमच्या मिशीला कुणाचं खरकटं लागलेलं नाही. आम्ही कुणाच्याही मिंद्यात नाही. जिथं-जिथं चूक असेल, तिथे सरकारविरोधी भूमिका घेऊन स्वाभीमान दाखवू. शिवाय आमचं चुकलेलं लेकरु परत आणू, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या दुराव्याबाबत भाष्य केलं. ते 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, तूर, कर्जमाफी, स्वाभिमानीतील अंतर्गत धुसफूस आणि आत्मक्लेश आंदोलन या सर्वांवर रोखठोक मत मांडलं. आमचा वाद वैचारिक माझ्यातला आणि सदाभाऊंमधला वाद वैचारिक आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन सरकारशी संघर्ष करताना सत्तेत राहायचं की नाही यावरुन मतभेद आहेत. पण आमचे टोकाचे मतभेद नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले. सदाभाऊंना शब्द दिला होता... "आम्ही 2004 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. सदाभाऊ खोत हे 2009 मध्ये आमच्यात सामील झाले. सदाभाऊ जेव्हा भेटले तेव्हा परिस्थितीने हताश झाले होते. मी रस्त्यावर आलोय, पुन्हा चळवळीत आलो तर वरच येणार नाही, असं म्हणत होते. पण मी त्यांना शब्द दिला, जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असाल, तोपर्यंत तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यावेळी मी आमदार होतो. जर काही झालंच असतं, निवडणुकी हरलो असतो, तर मला मिळणाऱ्या माजी आमदाराच्या पेन्शनमधून अर्धे सदाभाऊंना देऊ, असं सांगितलं होतं. मात्र ती वेळ आली नाही", असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. सदाभाऊंनी चळवळीत दिवस काढले. त्यामुळेच मी माझ्यासाठी काहीही न मागता, माझ्या माणसासाठी मंत्रिपद मागितलं. भाजपने 3 विधानपरिषदेच्या जागा देतो असं सांगितलं होतं, मात्र एकच मिळाली. आता उरलेल्या जागा काही मिळणार नाहीत याची खात्री आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले. मोदी सरकारकडून भ्रमनिरास ज्यावेळी लोकांना आश्वासक चेहरा मिळतो, तेव्हा लोक परिवर्तनासाठी तयार होतात. मोदींच्या आश्वासक चेहऱ्याला लोकांनी पसंती दिली. मात्र मोदी सरकारकडूनही भ्रमनिरास झाला. सरकारनं आमचा अपेक्षाभंग केल्याची खदखद मनात आहेच, असं राजू शेट्टी म्हणाले. भाजपचं फसवं यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश फसवं आहे, हे यश मृगजळासारख, लोकांना पर्याय नसल्यानं भाजपला बहुमत मिळालं, असं राजू शेट्टी यांनी नमूद केलं. महायुतीने अपेक्षाभंग सरकारमध्ये असूनही आजही आमच्यावर सर्वाधिक गुन्हे आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय. आम्ही एनडीएत राहायचं नाही, याचा पुनर्विचार करु, अजून दोन वर्षं आमच्या हातात आहेत. मोदींनी अपेक्षाभंग केला आहे, दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, असंही राजू शेट्टी म्हणाले. आत्मक्लेश आंदोलन येत्या 22 तारखेपासून आमचं आत्मक्लेश आंदोलन सुरु होणार आहे. वाढलेल्या शेतकरी आत्महत्यां हे या आत्मक्लेश आंदोलनाचं मुख्य ध्येय असून, शेतकरी कर्जमुक्ती करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा या आमच्या मागण्या आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget