एक्स्प्लोर

पालिकेतल्या टक्केवारीमुळेच मुंबईची दैना : राज ठाकरे

‘मुंबईची सर्वाधिक वाट टक्क्यांच्या राजकारणाने लावली. त्याचबरोबर बाहेरच्या लोंढ्यांनी मुंबई अधिक बकाल झाली. त्यामुळे मोदींनी आधी मनपा, मंत्रालयातील साफसफाई करावी.’ अशी जोरदार टीका राज ठाकरेंनी केली.

मुंबई : पालिकेतल्या टक्केवारीनंच मंगळवारच्या पावसात मुंबईची दैना झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळाकडून राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आणि उदय तानपाठक यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वादापासून आरक्षणापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर त्यांनी आपली मतं व्यक्त केली. ‘मुंबईची सर्वाधिक वाट टक्क्यांच्या राजकारणाने लावली. त्याचबरोबर बाहेरच्या लोंढ्यांनी मुंबई अधिक बकाल झाली. त्यामुळे मोदींनी आधी मनपा, मंत्रालयातील साफसफाई करावी.’ अशी जोरदार टीका राज ठाकरेंनी केली. ‘...तर आरक्षणाची गरजच नाही’ ‘महाराष्ट्रात तयार होणाऱ्या नोकऱ्यांत मराठी मुला-मुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही. जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्याला आरक्षण द्यावं असं माझं ठाम मत आहे.’ अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. ‘मी हात पुढे केला होता, पण…’   मनसे-शिवसेना भविष्यात एकत्र येणार का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ‘मी हात पुढे केला होता. पण त्यांनी हाताला फक्त गुदगुल्या केल्या.’ दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. भाजप शिवसेनेला किंमत देत नाही हे शिवसेनेला कळायला हवं. ‘कोणी काय खावं हे सरकारने ठरवू नये!’ ‘कोणी काय खावं हे सरकारने किंवा इतर कोणीही ठरवू नये. पर्यूषणचा काळ आहे म्हणून कत्तलखाने चालवू नका. हे म्हणणं चुकीचं आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देणारं महाराष्ट्र हे राज्य आहे. गुजराती माणूस इथे व्यापार करायला आला कारण इथे पोषक वातावरण आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी यावेळी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्द्यावर निशाणा साधला. ‘राजकीयदृष्ट्या राहुल गांधी जोवर अस्तिवात आहेत तोवर भाजप अस्तिवात असेल.’ अशी मार्मिक टीकाही यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि भाजपवरही केली. राज ठाकरेंच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे : संघटना बांधणीत मी नेत्यांना दूर ठेवलं हे म्हणणं चुकीचं आहे : राज ठाकरे टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली : राज ठाकरे बाहेरच्या लोंढ्यांनी मुंबई अधिक बकाल झाली : राज ठाकरे पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं : राज ठाकरे मोदींनी आधी मनपा, मंत्रालयातील साफसफाई करावी : राज ठाकरे मी हात पुढे केला होता, पण हाताला गुदगुदल्या केल्या : राज ठाकरे महापुरुष जातीमध्ये विभागले गेले आहेत, आता देवही जातीमध्ये विभागले जात आहेत : राज ठाकरे घरी गणपती आणण्याची प्रथा फार पूर्वी कोकणात होती पेशव्यांच्या सोबतीनं ही प्रथा घाटावर आली : राज ठाकरे त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती सुरु केला : राज ठाकरे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या नोकऱ्यांत मराठी मुला-मुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही : राज ठाकरे आरक्षणाची गरजच नाही, जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्याला आरक्षण द्या : राज ठाकरे माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवतो पूर्णवेळ कसं राजकारण करतात : राज ठाकरे बाप्पाच्या कृपेने अमितचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत, त्याची प्रकृती उत्तम आहे : राज ठाकरे भाजप शिवसेनेला किंमत देत नाही हे शिवसेनेला कळायला हवं : राज ठाकरे पर्युषण आहे म्हणून कत्तलखाने बंद करणं हे चुकीचं : राज ठाकरे कोणी काय खावं हे सरकारने किंवा इतर कोणीही ठरवू नये : राज ठाकरे किरीट सोमय्या आता का व्होटिंग मशीनबद्दल बोलत नाही? : राज ठाकरे राजकीयदृष्ट्या राहुल गांधी जोवर अस्तिवात आहेत तोवर भाजप अस्तिवात असेल : राज ठाकरे मी परमेश्वराकडे मागणं मागतो की हे राज्य माझ्या हातात येवो आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडो : राज ठाकरे VIDEO :

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई हादरलं! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, हॉस्टेलच्या थरकाप उडवणारी घटना, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई हादरलं! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, हॉस्टेलच्या थरकाप उडवणारी घटना, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Mumbai-Goa Highway: 17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
Mumbai Crime News: नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा
नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget