एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर-मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे.

मुंबई: बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाशी जवळीक ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर जाऊन  मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतलं. जयदत्त क्षीरसागर आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट नवीन नाही. यापूर्वी ज्यावेळी फडणवीस बीडमध्ये आले होते, तेव्हा ते थेट क्षीरसागर यांच्या घरी चहा- पाण्यासाठी गेले होते. तेव्हापासून क्षीरसागर यांची भाजपसोबतची जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर-मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर, क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे ‘रॉयल स्टोन’वर गेले. तिथे त्यांनी पंकजांच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून विधानपरिषदेचे आमदार झालेले सुरेश धस त्यांच्यासोबत होते. काही दिवसांपूर्वीच बीडची राष्ट्रवादी म्हणजे धनंजय मुंडे बजरंग सोनवणे यासोबतच संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. एवढेच नाही तर पवारांना बीड भेटीचं आमंत्रण सुद्धा त्यांनी दिलं होतं. त्यामुळे त्या भेटीनंतर आता क्षीरसागर आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याने क्षीरसागरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. बीडमधील राष्ट्रवादीचा वाद बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद राज्याला परिचीत आहे. धनंजय मुंडेंसोबतच्या वादामुळे राष्ट्रवादीचे मोठे नेते सुरेश धस हे भाजपमध्ये दाखल झाले. तर जिल्हा परिषद. नगरपालिका निवडणुकांमध्ये जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीपासून लांब होते. जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात वाद आहेत. बीडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद टोकाला गेला होता. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. संदीप क्षीरसागर यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने बीड राष्ट्रवादीची धुरा संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आहे. त्यामुळेही जयदत्त क्षीरसागर सध्या राष्ट्रवादीपासून लांब आहेत. कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?
  • जयदत्त क्षीरसागर हे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत
  • 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा पराभव केला होता
  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री होते
  • जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
संबंधित बातम्या क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीला आणखी एक झटका? बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांविरोधात पुतण्या संदीप यांची तक्रार  अजित पवारांच्या दौऱ्याला बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर गटाची दांडी 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
Embed widget