एक्स्प्लोर

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! प.उपनगरांतील 'या' भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

Mumbai Water Cut : मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्‍वरूपी सुधारणा होण्‍यासाठी पी उत्तर विभागात मार्वे मार्गावरील  जलवाहिनी बदलण्‍याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

मुंबई :  मुंबईतील पश्चिम उपनगरातील काही भागात दोन  दिवस पाणीपुरवठा बंद (Mumbai Water Cut)  करण्यात आला आहे. 27   आणि 28  मे रोजी पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही भागात पाणी नसणार आहे. जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे 24 तासा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय.  

मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्‍वरूपी सुधारणा होण्‍यासाठी पी उत्तर विभागात मार्वे मार्गावरील  जलवाहिनी बदलण्‍याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. सोमवार (27 मे)  रोजी रात्री 10  पासून ते मंगळवार (28 मे)  रात्री 10 पर्यंत  जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात  येणार आहे.  त्‍यामुळे सोमवार (27 मे)  रोजी रात्री 10  पासून ते मंगळवार (28 मे)  रात्री 10  वाजेपर्यंत पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे , असे आवाहन पालिकेच्‍यावतीने करण्‍यात येत आहे.

जलवाहिनी बदलण्याच्या काम  मार्वे मार्गावरील शिंदे गॅरेज ते ब्ल्यू हेवेन हॉटेल, मार्वे मार्ग, मालाड पश्चिम, पी उत्तर विभागापर्यंत मार्वे रस्‍त्‍यालगत असलेली जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. या कामतानंतर भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होऊन जलवाहिनीतील पाण्‍याचा दाब वाढण्यास मदत होणार आहे. एकंदरीतच मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे. 

खालील भागातील पाणीपुरवठा बंद

  •  पी उत्‍तर विभाग- अंबोजवाडी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 11.30 ते मध्य रात्रीनंतर 12.35 ) 27 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
  • पी उत्‍तर- आजमी नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 12 ते मध्‍यरात्रीनंतर 1.30 )  28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
  •  पी उत्‍तर विभाग- जनकल्‍याण नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 1.30 ते मध्‍यरात्रीनंतर 3) – 28  मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
  • पी उत्‍तर विभाग- मालवणी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 8 ते सकाळी 11.50) – 28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
  • पी उत्‍तर विभाग- अली तलाव मार्ग, गावदेवी मार्ग, इनासवाडी, खारोडी, राठोडी गाव, मालवणी गाव, खारोडी गाव, मनोरी, पटेलवाडी, शंकरवाडी, मार्वे गाव, मढ क्षेत्र, मनोरी गाव (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 4.20 ते रात्री 10 ) –28 मे  रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
  • आर दक्षिण विभाग- छत्रपती शिवाजी महाराज संकूल, न्‍यू म्‍हाडा ले आऊट (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्‍यरात्रीनंतर 1.30 ते मध्‍यरात्रीनंतर 3) –  28 मे  पाणीपुरवठा बंद राहील.  
  •  आर मध्‍य विभाग- गोराई गाव, बोरिवली (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 7.30) – 28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.    

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून चार ते पाच  दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.

हे ही वाचा :

Maharashtra Drought : दुष्काळाचा वणवा उरी पेटला! महाराष्ट्राच्या घशाला कोरड अन् डोक्यावर दुष्काळाचे ढग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Embed widget