एक्स्प्लोर

Mumbai University: सिनेट निवडणुकीसाठी ठाकरे गट पुन्हा आक्रमक! आशिष शेलारांच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही; ठाकरे गटाचा दावा

Mumbai University: सिनेट निवडणुकांसंदर्भात आशिष शेलारांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. सिनेट सदस्यांनी याबाबत आज विद्यापीठातील कुलगुरुंची भेट घेऊन पत्र सोपावलं आहे.

मुंबई: मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेली सिनेट निवडणूक (Senate Election) पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित केली आहे. सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सिनेट निवडणुकांसंदर्भात आशिष शेलारांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

ठाकरे गटाकडून तक्रारीवर स्पष्टीकरण

भाजपकडून मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीसंदर्भात तक्रार करण्यात आली. मतदार यादीत एकाच मतदाराची नावं दोन ते तीन वेळेस आल्याची तक्रार आशिष शेलार यांनी केली. मात्र अंतिम मतदार यादीमध्ये उमेदवारांची कुठल्याही प्रकारे दोनदा किंवा तीनदा नावं आलेली नाहीत, प्रत्यक्षात एकाच नावाचे दोन मतदार हे वेगवेगळे मतदार आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

सिनेट निवडणुका लावण्याची ठाकरे गटाची मागणी

मतदार यादीत मतदारांची दोन-तीन वेळा नावं आल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलारांनी केली, तसं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलं होतं. त्यानंतर अंतिम आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या. मात्र मतदार यादीची 3 वेळा पडताळणी झाली असल्याचं ठाकरे गटाने स्पष्ट केलं आहे. युवासेना पदाधिकारी आणि सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठात कुलगुरुंची भेट घेऊन याबाबतचं पत्र देखील त्यांच्याकडे सोपावलं आहे. त्यामुळे आता कारणं शोधणं सोडा आणि निवडणुका लावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

असा होता निवडणुकीचा कार्यक्रम

सिनेटची निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली. तर 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार होता. 

आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत, तर  विरोधक देखील  आक्रमक झाले आहेत. सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) सडकून टीका केली. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला आदित्य ठाकरे  यांनी लगावला आहे.

'सिनेट तुमचं सरकार पाडणार नाही, आम्हीच तुमचं सरकार पाडणार'

दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले आणि आता महाशक्ती सोबत असूनही निवडणुकीला घाबरतात का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना केला. लोकसभेला देखील असंच करण्याची शक्यता आहे, लोकसभेला देखील निवडणुका जाहीर करतील आणि मग स्थगित करतील, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. सिनेट तुमचं सरकार पाडणार नाही, तर आम्हीच तुमचं सरकार पाडणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा:

Mumbai University : पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीवर स्थगिती का? मुंबईने विद्यापीठाने स्पष्ट सांगितलं...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget