एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता 

Mumbai University Hostel Naming Issue : वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव द्या असा राज्यपालांच्या सूचना आहेत तर वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी छात्रभारतीनं केली आहे.

Mumbai University Hostel Naming Issue : मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला नामकरण वाद चिघळण्याची शक्यता आहे. या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव द्या असा राज्यपालांच्या सूचना आहेत तर वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी छात्रभारतीनं केली आहे. 8 जुलै रोजी मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं.

या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे अशा सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केल्या आहेत. वीर सावरकर यांना देखील कुलगुरुंनी कुठे स्थान द्यावं. जे होस्टेल बनत आहे त्याला सावरकर यांचे नाव द्यावे, असं राज्यपालांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात म्हटलं होतं. मात्र दुसरीकडे या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता छात्रभारतीने लावून धरली आहे यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंना पत्रव्यवहार केला आहे. शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष आणि त्यांचे कार्य आणि विचार लक्षात घेता वस्तीगृहला छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावं अशी मागणी पत्रात केली आहे. त्यामुळे वसतिगृहाला नाव देताना नाव नेमकं कोणतं द्यायचं? असा पेच विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरुंसमोर उभा राहिला आहे.

भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले
मुंबई विद्यापीठाच्या चार इमारतींचे उद्घाटन आठ जुलै रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमात राज्यपालांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे नामकरण 'वीर सावरकर' करावे, अशी सूचना आपल्या भाषणात कुलगुरूंना केली. ही सूचना राज्यपालांनी केल्यानंतर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने तातडीने कुलगुरूंना पत्र लिहून या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे नाव 'छत्रपती शाहू महाराज' द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे या वसतीगृहाचे नामकरण करताना विद्यापीठ प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
 
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज भवन, ज्ञान स्रोत केंद्र, मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचं उद्घाटन केलं. या उद्घाटन कार्यक्रमात बोलत असताना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांचे कार्य महान आहे, अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदराचे स्थान देत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला नाव वीर सावरकरांचं द्यावं अशी सूचना राज्यपालांनी भाषणावेळी केली. जेणेकरून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहात जे विद्यार्थी शिक्षणासाठी येतील त्यांना सावरकर यांच्या कार्याबद्दल त्यासोबतच भारताच्या इतिहासाबद्दल माहिती होईल, असं मत राज्यपालांनी यावेळी मांडले.
 
मात्र, राज्यपालांनी सूचना करताच छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे नाव 'छत्रपती शाहू महाराज' करावे अशी मागणी पत्र कुलगुरूंना पाठवलं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुरुवात केली. त्यांनी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. त्यांचे कार्य आणि विचार लक्षात घेता त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. या वसतिगृहाला नाव देताना आम्हाला कुठल्याही नावाला विरोध नाही. मात्र आम्ही सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांनी वेळोवेळी हे वसतिगृह व्हावे यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचे विचार व कार्य बघता त्यांचं नाव या वसतिगृहाला असावे, अशी आमची मागणी आम्ही कुलगुरू पुढे मांडली आहे' असे छात्रभारती  राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी 'एबीपी माझा' शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता वसतिगृहाचा नामकरण करताना नेमका काय निर्णय विद्यापीठ प्रशासन घेतं हे बघावे लागेल

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget