एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Metro: मुंबई मेट्रोच्या अवतीभोवती राजकारण फिरतंय, शिवसेना आणि भाजपची श्रेयवादाची लढाई

Narendra Modi Mumbai Visit: मुंबईतील पहिल्या मेट्रोपासून सुरू झालेलं श्रेयवादाचं राजकारण आता दहिसर मेट्रोपर्यंतही सुरूच असल्याचं दिसून येतंय.

Mumbai Metro: मुंबईतील मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ चं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मेट्रो 7 दहिसर ते अंधेरी तर मेट्रो 2 अ दहिसर ते डीएन नगर धावणार आहे. ज्यामुळे पश्चिम उपनगरांवरील वाहतुकीचा ताण हलका होईल. मुंबई आणि उपनगरात येत्या काही वर्षात 14 मेट्रो धावताना बघायला मिळतील.  

मेट्रो म्हणजे गारेगार प्रवास आणि वेळेची बचत. मुंबई मेट्रो ही मुंबईतील वाहतूक कोडींवर मोठा पर्याय समोर आला होता. मात्र, कधी निधीची कमतरता, कधी कालावधी वाढण्यासारख्या समस्यांचा सामोरे जाताना 2014 साली पहिली मुंबई मेट्रो मुंबईकरांना मिळाली. मात्र, मेट्रोच्या अवतीभवती राजकारण फिरल्याचं नेहमीच बघायला मिळालं. 

मेट्रो-1 चं उद्घाटन होण्याआधीच मेट्रोच्या नावावरुन राजकारण रंगताना दिसलं. रिलायन्स मेट्रोच्या नावाला शिवसेना आणि आरबीआयनं विरोध केला आणि वर्सोवा-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रोचं नाव मुंबई मेट्रो असणार असल्याचं जाहीर केलं.

सन 2014 साली राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार बदललं आणि मुंबईतील अनेक मेट्रोची प्रकल्प जाहीर झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोचे जाळे कल्याण आणि विरारपर्यंत विणणार असल्याचं सांगितलं. अशात मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पाचा जन्म झाला. मात्र, कारशेडचा वाद सुरु झाला तो आजतागायत सुरुच आहे. 

एमएमआरसीएलनं मेट्रो-3 च्या निविदा काढल्या. प्रकल्प खर्च 23 हजार कोटींचा होता. मात्र या प्रकल्पाचा खर्च 10 हजार कोटींनी वाढला आणि संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 33 हजार कोटींच्या पार गेला. 2019 साली आरेत कारशेडसंदर्भात झालेल्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आणि यात शिवसेना उतरताना बघायला मिळाली. सत्तेत असतानाही शिवसेना-भाजप संघर्ष सुरु असताना रस्त्यावर उघड संघर्ष बघायला मिळाला. 

मेट्रो-3 च्या अधिकारी अश्विनी भिडे यांनी कारशेडसाठी आरेचीच जागा योग्य आहे म्हणत काम सुरु केलं खरं, पण त्याला मोठा विरोध होताना दिसला. अशात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही आरेतील कारशेडला विरोध केला. अनेक जणांवर गुन्हे दाखल झालेमात्र प्रकल्पाचं काम सुरुच राहिलं.

सन 2019 सालच्या शेवटी महाविकासआघाडी सरकार आलं आणि मेट्रो-3 चा कारशेड कांजूरमार्गला हलवलं गेलं. आरे आंदोलनातील लोकांवर गुन्हे देखील मागे घेण्यात आले. मात्र, पुन्हा एकदा राज्य सरकार बदललं आणि कांजूरमधील कारशेड प्रकल्प पुन्हा एकदा आरेत दाखल झाला. मात्र, निधीची कमतरता, प्रकल्प पूर्ण करण्याची गती आणि कोरेनाच्या पार्श्वभूमीमुळे मेट्रो-3 ला मोठाफटका बसला. आरे आरशेडचं काम अद्यापही पूर्ण झालं नसून याचा वाद अद्यापही न्यायालयात सुरु आहे. 

मेट्रो-३ प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या डिसेंबर महिन्यात सुरु करण्याचा मानस असला तरी आरेत कारशेड होण्यासाठी पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. मेट्रो-3 प्रकल्पाचं काम 78 टक्के पूर्ण झालंय. जून 2024 मध्ये लोकांसाठी पूर्णपणे खुला होईल. मात्र, कारशेडच्या राजकारणात मेट्रो अडकल्याने प्रकल्प पुढे धावताना अडचणी येतायत.

मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ चं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मात्र, या दोन्ही प्रकल्पाच्या श्रेयवादावरुन लढाई सुरु झालेली आहे. पहिल्या फेजचं उद्घाटन गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं होतं. अशात सरकार बदलताच शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याचं ठरवलं. आम्हीच सुरु केलेले प्रकल्पं पुढे नेले जात असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. 

मेट्रो-7 आणि मेट्रो 2अ मुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, सोबतच वेळेची बचत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, येत्या काळात आणखी काही प्रकल्प पुढील 2 वर्षात पूर्णत्वास जातायत. अशात याचं देखील राजकारण रंगताना बघायला मिळू शकतं. 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget