एक्स्प्लोर

Mumbai BEST Bus News :  मोठी बातमी! बेस्टच्या ताफ्यातील 400 बसचा वापर तात्पुरता बंद, प्रशासनाने दिले आगीचे कारण

Mumbai BEST Bus News : मुंबईकर प्रवाशांना गुरुवारपासून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. बेस्टकडून कंत्राटी तत्वावरील 400 बस तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai BEST Bus News : मागील काही दिवसांपासून बेस्टच्या बसला (BEST Bus) आग (Fire) लागण्याच्या घटना समोर येत आहेत. आज, बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी अंधेरी पूर्व (Andheri East) येथील आगरकर चौकात सीएनजी बसला आग लागल्याची घटना घडली. बेस्ट बसला आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने बेस्ट प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या 400 कंत्राटी बसेसच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

मुंबईकरांसाठी बेस्ट बस सेवा ही लाईफलाईन समजली जाते. दररोज जवळपास 30 लाखांच्या आसपास प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. मात्र, मागील काही दिवसांत तीन बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या बसेस मातेश्वरी लिमिटेड या कंत्राटदाराच्या ताफ्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज, अंधेरीतील आगरकर चौकात ज्या बसला आग लागली ती बस मातेश्वरी या कंत्राटदाराची आहे. त्यामुळे आता, या कंत्राटदाराच्या ताफ्यातील बसेसची तपासणी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने या बसेसची तपासणी होणे आवश्यक असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. प्रवाशांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

उद्यापासून प्रवाशांना मनस्ताप?

खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने लिजवर बसेस घेतल्या आहेत. तर, दुसरीकडे बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या कमी होत आहे. आता, बेस्ट प्रशासनाने मातेश्वरी लिमिटेडच्या 400 बसेस 'ऑफ रोड' करण्याचा निर्णय घेतल्याने बेस्ट बसचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकाच वेळी एवढ्या प्रमाणावर बसेस धावणार नसल्याने बेस्ट बसच्या वेळापत्रकात बदल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. आधीच मुंबईत विविध कामांमुळे वाहतूक कोंडी असल्याने बस उशिराने धावतात. त्यातच आता, बसची संख्या कमी होणार असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget