एक्स्प्लोर

UPSC च्या धर्तीवर MPSC ने देखील विद्यार्थ्यांना केंद्र बदलून द्यावीत, युवा सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धरतीवर राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) देखील विद्यार्थ्यांना केंद्र बदलून द्यावीत, अशी मागणी युवा सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई : राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी होणार असल्याचं यापूर्वीच जाहिर करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 3 लाख 80 हजारांच्या आसपास विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेला बसणारे अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षांची तयारी करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये येत असतात. मात्र, सध्या कोरोना संसर्गामुळे मुलांची अडचण लक्षात घेतं केंद्रीय लोकसेवा आयोगाने ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून घेण्याची संधी दिली. त्याचप्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

विद्यार्थी अभ्यास करत असलेलं ठिकाणचं परीक्षा केंद्र म्हणून निवडत असतात. परंतु, सध्या राज्यभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच मागील साडेतीन ते चार महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या मूळ गावी परत गेले आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे हे विद्यार्थी आगामी 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी त्यांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित न राहू शकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केंद्र बदलून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणचे केंद्र मिळावं असं देखील युवा सेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. यंदा महाराष्ट्रातून या परीक्षेला तब्बल 3 लाख 80 हजार विद्यार्थी बसणार आहेत.

अशा परिस्थितीत विद्यार्थी कोरोना बाधित होण्याची शक्यता युवा सेनेचे मुंबई विद्यापीठाचे सिनेट प्रदीप सावंत, महादेव जगताप, राजन कोळेंबेकर, शीतल देवरूखकर आणि शशिकांत झोरे यांनी ही मागणी केली आहे. जर ही मागणी मान्य करण्यात आली तर या तब्बल 3 लाख 80 हजार विद्यार्थ्यांना केंद्र बदलून देण्यात येईल आणि त्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा देता येईल. सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला नाही तर अशा विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी परीक्षेसाठी यावं लागेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागेल. अशा परिस्थितीत विद्यार्थी कोरोना बाधित होण्याची शक्यता देखील नाकारता येतं नाही. असं युवा सेनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

आदिवासी तरुणाचा राष्ट्रीय धावपटू ते नायब तहसीलदार पर्यंतचा संघर्षमय प्रवास

लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा : युवासेना या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले, की सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईत याचं प्रमाण सर्वाधिक आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचं प्रमाण सप्टेंबर महिन्यांपर्यंत कमी होईल असं वाटतं नाही. लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे. ही परीक्षा जुलै महिन्यांत होईल असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु, बिघडणारी परिस्थिती पाहता आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आणि ती सप्टेंबर महिन्यांत होईल असं जाहिर केलं. परंतु, सध्याच्या परिस्थितीवरुन वाटतं नाही की ही परीक्षा सप्टेंबर महिन्यांत देखील होईल. परंतु, जर ही परीक्षा सप्टेंबर महिन्यांत झाली तर असे अनेक विद्यार्थी आहेत. जे मुंबई, पुण्यासारख्या शहरात परीक्षेची तयारी करण्यासाठी येतं असतात. जे सोयीचे परीक्षा केंद्र म्हणून ज्या ठिकाणी ते अभ्यास करत आहेत. त्याचं ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडतात. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला नाही तर या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसेल. त्यामुळे आयोगाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही युवा सेनेने केली आहे.

वॉचमनचा मुलगा झाला नायब तहसीलदार! जिद्द, मेहनत आणि संघर्षाचं प्रतिक दत्ता बोरसे | स्पेशल रिपोर्ट

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar & Raj Thackeray: पोलीस FIR घेईनात, अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेर रोहित पवारांनी राज ठाकरेंची मदत मागितली, शिवतीर्थवरील भेटीची इनसाईड स्टोरी
पोलीस FIR घेईनात, अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेर रोहित पवारांनी राज ठाकरेंची मदत मागितली, शिवतीर्थवरील भेटीची इनसाईड स्टोरी
Rohit Pawar on NCP Merger: रेवतीच्या लग्नाची बातमी द्यायला अजितदादांना फोन केला, पण शरद पवारांना बोलता येत नव्हतं, साहेबांची अवस्था पाहून अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं: रोहित पवार
पवार साहेबांना बोलायचं होतं पण छातीत कफ असल्यामुळे शब्द कळत नव्हते, 'ती' अवस्था पाहून अजित पवारांचे डोळे पाणावले: रोहित पवार
Ritu Tawde Rolex Watch: रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण म्हणाल्या, 'ते घड्याळ...'
रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण म्हणाल्या, 'ते घड्याळ...'
मोठी बातमी! जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य; कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, संख्या किती?
मोठी बातमी! जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य; कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, संख्या किती?

व्हिडीओ

Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण
Rohit Pawar on Ajit Pawar Accident : दादांच्या अपघाताच्या चौकशीचा तिढा FIR साठी लढा` Special Report
Sunetra Pawar NCP President : आव्हानांचे डोंगर सुनेत्राताई कशा पेलणार? Special Report
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Sunetra Pawar UNCUT Speech : हुंदका दाटला, निर्धार केला, दादांची स्वप्न पूर्ण करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bank Holiday Update : मार्च महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी? बँका कोणत्या दिवशी बंद असणार? संपूर्ण यादी
मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार? बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पाहा
Liquor Policy Case: कथित मद्य घोटाळ्याचे आरोप, ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांसह आम आदमी पक्षाचे चार टाॅप लीडर जेलमध्ये अन् तेच आता सर्व निर्दोष सुटले
कथित मद्य घोटाळ्याचे आरोप, ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांसह आम आदमी पक्षाचे चार टाॅप लीडर जेलमध्ये अन् तेच आता सर्व निर्दोष सुटले
Arvind Kejariwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
बारावी परीक्षेत 'फाटाफुटी' सुरुच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर सुद्धा फोडला; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
बारावी परीक्षेत 'फाटाफुटी' सुरुच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर सुद्धा फोडला; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी मनाला 'मनसे' कानमंत्र
तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी मनाला 'मनसे' कानमंत्र
India vs West Indies : पॉइंट्स, रनरेट अन् संपूर्ण समीकरण फसलं! IND vs WI सामना रद्द झाला तर सेमीफायनलचं तिकीट कोणाच्या खिशात जाणार?, जाणून घ्या ICC नियम
पॉइंट्स, रनरेट अन् संपूर्ण समीकरण फसलं! IND vs WI सामना रद्द झाला तर सेमीफायनलचं तिकीट कोणाच्या खिशात जाणार?, जाणून घ्या ICC नियम
HSC paper leak: बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?
बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?
Rajya Sabha Election 2026: मोठी बातमी: उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत मोठा डाव टाकणार? अंबादास दानवे, विनायक राऊतांना दिल्लीला पाठवणार?
उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत मोठा डाव टाकणार? अंबादास दानवे, विनायक राऊतांना दिल्लीला पाठवणार?
Embed widget