एक्स्प्लोर

..अन्यथा फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन केंद्रात जाणार : आमदार विनायक मेटे

राज्याने 50 टक्के आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करावी अन्यथा फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन केंद्रात जाणार, शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांची मागणी.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 टक्के आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. जर राज्य सरकारने हे पाऊल उचललं नाही तर आम्ही तत्काळ विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय नेत्यांची भेट घेऊ. त्यांना सर्वोच्च न्यायालयात 50 टक्के आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं आवाहन करू, अशी माहिती आज एबीपी माझाशी बोलताना शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी दिली आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर गुरुवारी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये आरक्षण देण्याचे अधिकार राज्यालाच आहे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. या याचिकेवर निर्णय लवकर जर लागला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे अधिकार राज्यालाच आहे, असे स्पष्ट केले तर याचा फायदा निश्चित आपल्याला होईल. राज्य सरकारला देखील विनंती आहे, आपण त्वरित आपले म्हणणे न्यायालयात दाखल करावे. समाज म्हणून या अगोदरचं मी स्पष्ट केलंय की आम्ही न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करू. अपेक्षा आहे न्यायालय केंद्र सरकारचे म्हणणे सकारात्मक रितीने ऐकेल आणि आमचा प्रश्न मार्गी लागेल, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिलीय. 

यासोबतच 50 टक्के आरक्षणाबाबत देखील राज्य सरकारने तात्काळ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी. खरंतर केंद्राने दाखल केलेली 102 व्या घटनादुरुस्तीला आव्हान देणारी याचिका राज्य सरकारने दाखल करणे अपेक्षित होते. परंतु, तसं झालं नाही. उलट मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका करणं सुरू ठेवलं आहे. त्यांनी हे बंद करून तत्काळ राजीनामा द्यावा. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 टक्के आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. जर राज्य सरकारने हे पाऊल उचललं नाही तर आम्ही तत्काळ विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय नेत्यांची भेट घेऊ, अशी माहिती आज एबीपी माझाशी बोलताना शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी दिली आहे.

दरम्यान विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलंय की, 102 व्या घटनादुरुस्ती बाबतची याचिका अगोदरच शिवसंग्राम पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचाच दाखला देत केंद्र सरकारने गुरुवारी पुनर्विचार याचिका दाखल केली. या याचिकेच्या माध्यमातून मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. महत्त्वाची बाब ही आहे की याबाबत राज्य सरकार सपशेल अपयशी पडलं आहे. खरंतर हे संपूर्ण प्रकरण आम्ही 11 किंवा 13 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सातत्याने मागणी करत होतो. परंतु, याठिकाणी ही बाजू कोर्टात लावून धरण्यास राज्य सरकारचे वकील कमी पडले. परिणामी मराठा आरक्षण रद्द होण्याची नामुष्की राज्य सरकारवर आणि मराठा समाजावर ओढवली. यासोबतच 102 व्या घटनादुरुस्तीबाबत आम्ही सातत्याने सांगत होतो की राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत. याबाबत देशाचे अटर्नी जनरल यांनी देखील स्पष्ट केलं होतं. परंतु, हा मुद्दा राज्य सरकारनं तितकासा कोर्टात मांडला नाही. सातत्याने केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम सुरू ठेवलं. आता माझी मागणी आहे किमान 50 टक्के आरक्षण बाबत पुनर्विचार याचिका तरी सर्वोच्च न्यायालयात दाखल करा अन्यथा आम्हालाच पाऊले उचलावी लागतील.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Sanjay Raut and PM Modi: पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
BMC Samiti Election 2026 Shivsena UBT Uddhav Thackeray: BMC मधील अनुभवी नगरसेवक, पण तरीही चुकून ठाकरे गटाऐवजी भाजपला मतदान; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
BMC मधील अनुभवी नगरसेवक, पण तरीही चुकून ठाकरे गटाऐवजी भाजपला मतदान; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
IPL 2026 All Teams Players List: मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत...; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad
मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत...; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad
Sanjay Raut and PM Modi: पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
धुरंधर 2 चे तिकिटाचे दर आकाशाला भिडलेत, मुंबई दिल्लीत बहुतेक शो sold out! एका तिकिटाचा दर किती माहितीय ?
धुरंधर 2 चे तिकिटाचे दर आकाशाला भिडलेत, मुंबई दिल्लीत बहुतेक शो sold out! एका तिकिटाचा दर किती माहितीय ?
Embed widget