![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
महाराष्ट्र निर्बंधमुक्त; नववर्षापासून नवीन संकल्प करूयात: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Maharashtra covid-19 Guidelines: गेल्या 736 दिवसानंतर महाराष्ट्रातून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
![महाराष्ट्र निर्बंधमुक्त; नववर्षापासून नवीन संकल्प करूयात: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Maharashtra Corona Restriction Free Let's make new resolutions from New Year: Chief Minister Uddhav Thackeray महाराष्ट्र निर्बंधमुक्त; नववर्षापासून नवीन संकल्प करूयात: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/01/4a1706dfd0c85734cd161414a1a0dc4e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra covid-19 Guidelines: गेल्या 736 दिवसानंतर महाराष्ट्रातून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याच बैठकीत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत.'' यावेळी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत की, ''कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला, असं ते म्हणाले. तसेच पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.
महत्वाच्या बातम्या:
Mask : क्लीन अप मार्शलच्या 'मास्क वसुली'पासून नागरिकांना मुक्ती; राज्यात मास्कचा वापर आता ऐच्छिक
Maharashtra Corona Updates : निर्बंध मुक्तीची 'गुढी'; महाराष्ट्रातले कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)