एक्स्प्लोर

केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर करावं : देवेंद्र फडणवीस

कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने पॅकेज देण्याची मागणी केली.

मुंबई : केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर केलं पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच कोरोना व्हायरसमुळे उभं राहिलेल्या संकटचा मुकाबला सरकार पाहिजे तसा करत नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना भेटीची माहिती देताना सरकारवर टीकाही केली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, मनोज कोटक यांचा समावेश होता.

राज्य सरकारने पॅकेज द्यावं ज्याप्रकारे केंद्र सरकारने पॅकेज दिलं तसं पॅकेज राज्य सरकारने द्यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, "शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत आहे. शेतमाल घरीच पडून आहे. खरेदीसाठी राज्य सरकारने व्यवस्था केलेली नाही. खरेदीचे पैसे केंद्र सरकार देतं, खरेदी राज्य सरकारला करावी लागते. त्याचीही व्यवस्था अद्याप झालेली नाही. खरिपाचा नवीन हंगाम आहे, त्याची व्यवस्था झालेली नाही. बियाणं, खतं, कर्ज मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर विचित्र परिस्थिती आली आहे. यासोबतच बारा बलुतेदारांसमोर मोठं संकट आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकारने एक पॅकेज दिलं, वेगवेगळ्या राज्य सरकारांनीही पॅकेज दिलं आहे. महाराष्ट्राचं एकमेव सरकार आहे, ज्याने पॅकेज दिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही पॅकेज दिलं पाहिजे. विशेषत: बारा बलुतेदारांना पॅकेज दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे."

पवारांनी एखादं पत्र उद्धव ठाकरेंना लिहावं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासंदर्भात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. त्यावरही फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, "शरद पवार पंतप्रधान मोदींना पत्र लिहितात आणि मदत करा अशी मागणी करतात. आमची पवारांना विनंती आहे की त्यांनी एखादं पत्र उद्धव ठाकरे यांनाही लिहिलं पाहिजे. कारण राज्य सरकारच्या वतीने कोणतीही मदत करण्याचा विचार इथे दिसत नाही."

परप्रांतिय मजुरांना मदत नाही सरकारने परप्रांतिय मजुरांना कुठलीही मदत केली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. "केवळ घोषणा होतात. दहा हजार एसटी देणार, पण त्या एसटी कुठेही दिसत नाही. परप्रांतिय मजुरांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. असं होत असताना यांचे नेते केवळ राजकारण करत आहेत. मजुरांच्या तिकीटामधील 85 टक्के पैसे केंद्र सरकार देणार आणि 15 टक्के पैसे राज्य सरकारने द्यायचे. परंतु त्यासंदर्भात आमचे मंत्री इतके अज्ञानी आहेत की त्यांना हेही माहित नाही एका तिकीटाचा खर्च किती आहे, तिकीटातून किती पैसे घेतले जात आहेत," असं फडणवीस म्हणाले.

"महाराष्ट्र बचाओ"द्वारे सरकारला जागं करणार! राज्य सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "खरंतर कातडी बचाव धोरण राज्य सरकारच्या वतीने सुरु आहे. त्यामुळे आपली आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे अडचणीत आली आहे. या विविध मुद्द्यांवर आम्ही एक निवेदन राज्यपालांना दिलं आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. जनतेच्या वेदना मांडल्या नाही तर त्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे जनतेच्या वेदना मांडण्यासाठी 'महाराष्ट्र बचाओ' अशाप्रकारची भूमिका आमची आहे. या भूमिकेतून आम्ही टप्प्याटप्प्याने राज्य सरकारला जागं करण्याचं काम करणार आहोत."

आम्ही मुद्दे मांडतोय पण तोडगा निघत नाही सर्वपक्षीय बैठकीनंतर कुठलाही परिणाम झालेली दिसत नाही, असं फडणवीस म्हणाले. "आजही सामान्यांना रेशन मिळत नाही. रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरु आहेत. केंद्र सरकारने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही दोन महिने रेशन देण्याचा अधिकार दिला आहे. पण ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत, त्यांनाही धान्य मिळत नाही. त्यामुळे जे जे मुद्दे मांडत आहोत, त्यावर तोडगा निघत नाही. मुंबईत रुग्णांना अॅडमिशन मिळत नाही. चार चार तास अॅम्ब्युलन्स येत नाहीत. अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने अनेकांचे मृत्यू होत आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

कठोर निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही सरकारच्या मागे दरम्यान आम्ही सरकारला मदत करण्यास तयार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. "आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत. सरकारने आमची मदत घ्यावी. आमची मदत नको असेल तर त्यांनी स्वत: करावं. पण सरकार काही करणार नाही. राज्य सरकारला जी मदत हवी ती आम्ही करु. कठोर निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही मागे उभे राहू. मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी विरोधी पक्षांसोबत बैठक घेतली. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. ही बैठक म्हणजे नुसती औपचारिक्त असू नये. त्यातून तोडगा निघायला पाहिजे," असंही त्यांनी म्हटलं.

केंद्राप्रमाणे राज्यानंही पॅकेज जाहीर करावं,राज्याची स्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी - देवेंद्र फडणवीस

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Mumbai BEST Bus Accident: भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Embed widget