एक्स्प्लोर

पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख

वारंवार विनंती करुनही नियम मोडणाऱ्या नागरिकांवर आता प्रशासन कडक कारवाई करणार आहे. कारण, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तशा सूचना दिल्या आहेत.

मुंबई : पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा, त्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडणारी टोळकी शांत बसणार नाहीत, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात. विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांना एकप्रकारे सज्जड दमच अनिल देशमुख यांनी दिला आहे. राज्यात जमावबंदी असतानाही लोक गर्दी करत आहेत. त्यामुळेच नाईलाजाने संचारबंदी जाहीर करण्यात आल्याची माहिती देखमुख यांनी दिली. मात्र, यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. कोरोना व्हायरसमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील 90 टक्के जनता आम्हाला सहकार्य करत आहे. मात्र, पाचदहा टक्के लोकांमुळे पोलिसांवर ताण येत आहे. अशा लोकांना आता परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांना आता पोलीस वेगळ्या प्रकारे हाताळतील असा इशारा त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे वारंवार सांगत आहे. मात्र, ही पाचदहा टक्के लोक ऐकताना दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांविरोधात आम्ही गंभीर कारवाई करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा राज्यात संचारबंदी असतानाही लोक विनाकारण बाहेर फिरत आहे. या लोकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. तुम्हाला अत्यावश्यक असेल तर तुम्ही जरुर बाहेर पडा. मात्र, आता नियमांचा भंग करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नसल्याचा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी आपल्या काठ्यांना तेल लावून ठेवा आणि अशा लोकांवर कारवाई करण्याच्या सुचानाही त्यांनी दिल्या. दरम्यान, या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात शंभरीपार कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्यांचा आकडा आता वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 107 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यात मुंबईत सर्वाधिक 43 आहेत. तर, चार जणांचा मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत 11 जणांचा यात बळी गेलाय. पिंपरी चिंचवड मनपा – 12 पुणे मनपा – 19 मुंबई शहर आणि उपनगर – 43 नागपूर – 4 यवतमाळ – 4 नवी मुंबई – 5 कल्याण – 4 अहमदनगर – 3 रायगड – 1 ठाणे – 2 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 वसई-विरार – 1 Solapur Market Crowded | सोलापूरकरांना कोरोनाची भीतीच नाही! खबरदारी न बाळगता बाजारात झुंबड

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget