परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार ने आण करणारी वाहने अडवली जाणार नाही.

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी अडचण येत असेल तर पोलिसांच्या 100 क्रमांकावर कॉल करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणीही साठेबजीची संधी घेऊ नये.जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, अजूनही लोक परिस्थितीला गांभीर्याने घेत नाही. जीवनावश्यक वस्तू, औषधी, दुध ,भाजीपाला घेण्यासाठी बाहेर यावे लागणार आहे पण आपल्याला आता गांभीर्य ठेवावे लागणार आहे. मी पोलिंसाना देखील यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी या वस्तूंसाठी नागरिक बाहेर पडत असतील तर पोलिसांनी देखील त्याची योग्य खातरजमा करून घ्यावी. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार ने आण करणारी वाहने अडवली जाणार नाही. मात्र अशा अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या संस्था, कंपन्यांनी आपल्या वाहनांवर कंपन्यांचे नाव ठळकपणे लावावे तसेच कोणत्या आवश्यक वस्तूची वाहतूक करीत आहोत ते त्यात स्पष्ट लिहावे. वाहनांतील त्यातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
केंद्र सरकारचे आभार मानतो. आमच्या विनंतीनुसार आज रात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद होत आहे. गेल्या आठवड्यातच मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कर व जीएसटी परतावा तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली आहे. या अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, मंदिरे मदतीसाठी पुढे आले आहेत. लालबागच्या राजाने रक्तदान शिबिरे सुरु केले आहे तर शिर्डी, सिद्धीविनायक यांनी देखील आपापल्या परीने मदतीची तयारी दाखविली आहे. मदत करणाऱ्या संस्थाना कुठेही अडचण येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहे. हा महत्वाचा टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडू असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही : WHO
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावणार एसटीची 'लालपरी' आणि 'बेस्ट
CM Uddhav Thackeray PC | घरातच राहा, फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडू नका : उद्धव ठाकरेBefore You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
महत्त्वाच्या बातम्या





















