एक्स्प्लोर

मिलिटरी फार्ममधील गाई स्वस्तात विकण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

संरक्षण मंत्रालयाने प्रत्येकी एक हजार रुपये अशा कवडीमोल दराने या गाई विकण्याचा घाट घातला आहे, असा आरोप करत दिलीप काटे यांनी अॅडव्होकेट शेखर जगताप यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली.

मुंबई : देशभरातील मिलिटरी फार्म बंद करून त्यातील गाई कवडीमोल दराने विकणाच्या घाट घालणाऱ्या संरक्षण मंत्रालयाला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. केंद्र सरकारच्या या अनाकलनीय निर्णयाला स्थगिती देत हायकोर्टानं दोन आठवड्यांत केंद्र सरकारला यासंदर्भात आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

अहोरात्र खडतर परिस्थितींचा सामना करत देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना दुधाचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी विविध ठिकाणी मिलेटरी फार्म उभारण्यात आले होते. या फार्ममध्ये हजारो संक्रमीत गाई असून या गार्इंमार्फत दिवसाला लाखो लिटर दुध मिळते.

अशातही संरक्षण मंत्रालयाने प्रत्येकी एक हजार रुपये अशा कवडीमोल दराने या गाई विकण्याचा घाट घातला आहे, असा आरोप करत दिलीप काटे यांनी अॅडव्होकेट शेखर जगताप यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

बिटिशांच्या काळापासून सुरू असलेले हे मिलिटरी फार्म जुलै 2017 मध्ये संरक्षण मंत्रालयानं विक्रीसाठी काढले होते. त्यावेळी 40 हजार रूपये दराने या सर्व गाई विकत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळी गोवा सरकारनं 35 हजार रूपये दरानं तीन हजार गाई विकत घेण्याची तयारी दर्शवली होती.

याशिवाय एका सहकारी संस्थेनंही 37 हजार रूपये दरानं तीन हजार गाई विकत घेण्याची तयारी दर्शवली. मात्र काही कारणानं हा सौदा झाला नाही. त्यानंतर मे 2018 मध्ये संरक्षण मंत्रालयानं या गाई आता हजार रूपये प्रतिदरानं विकायला काढल्या आहेच.

1889 मध्ये ब्रिटिशांनी देशभरात 19 हजार एकर जमिनीवर एकूण 39 फार्म उभारले होते. या फार्ममध्ये हॅलंडच्या प्रिसनर्स आणि हिंदुस्थानातील सैलवाल या जातीच्या संक्रमणातून निर्माण झालेल्या प्रिसनर्स गाईंची पैदास करण्यात आली. या गाईंची खासियत म्हणजे या गाई कोणत्याही हवामानात तग धरू शकतात.

तसेच या गाई दिवसावा सहा ते सात लिटर दूध देतात. देशभरात या गाईंची संख्या 20 हजारांच्या घरात आहे. असे असतानाही संरक्षण मंत्रालयाने मे महिन्यात या गाई हजार रुपये प्रतिगाय दराने विकायला काढल्या आहेत. तसेच हे फार्म हाऊस बंद करण्याचा घाट घातला असल्याचे याचिकाकर्त्यांच्यावतीने हायकोर्टात सांगण्यात आले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सध्या जिवंत गाईची किंमत 15 ते 20 हजार असताना एक हजार रुपये असा दर संरक्षण मंत्रालयाकडून या गार्इंसाठी ठेवण्यात आला आहे. तर सध्या गाईचे मृत अवशेष म्हणजेच मांस आणि चामडीला चांगला दर मिळतो. तरीही मृत गाईची किंमत पाच हजार रुपये ठरवल्याचा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget