एक्स्प्लोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबई पारबंदर प्रकल्पाचा आज शुभारंभ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (15 जानेवारी) मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीचा शुभारंभ होणार आहे.

मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (15 जानेवारी) करण्यात येणार आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (शिवडी - न्हावा - शेवा मार्ग) प्रकल्पातला भारतातला सर्वात मोठ्या लांबीचा समुद्रावरील पुल मुंबईत उभा राहणार आहे.

ठाणे खाडीवर उभ्या राहणाऱ्या या 22 किमी लांबीच्या पुलाने दक्षिण मुंबईतला शिवडीचा भाग नवी मुंबईला जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे, मुंबई शहर थेट रायगडशी जोडलं जाणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग 4 वरच्या चिर्ले गावापर्यंत मुंबईचा विस्तार होणार आहे. त्यामुळे, रायगड जिल्ह्यातील नाव्हा-शेव्हा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत पोहोचता येणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासोबतही जोडला जाईल. ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडची वाहतूक सुलभ होईल. यासोबतच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही दक्षिण मुंबईहून कमी वेळात गाठता येईल.

आज काय होणार? स्वयंचलित लॉन्चिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी (erection of first span) आज होत आहे. या लॉन्चिंग गर्डरचे वजन एक हजार मे. टन असून लॉन्चिंग गर्डरची वजन उचलण्याची एकूण क्षमता सुमारे एक हजार 400 मे. टन इतकी आहे.

कसा आहे मुंबई पारबंदर प्रकल्प? 1. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (6+3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे.

2. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे.

3. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील शिवाजी नगर आणि राष्ट्रीय महामार्ग-4 ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) प्रस्तावित आहेत. हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे.

4. हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे. प्रकल्पाचे बांधकाम हे 3 स्थापत्य कंत्राटांद्वारे आणि 1 इंटेलीजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे. पुलाच्या पायाचे आणि स्तंभांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

5. त्याचप्रमाणे सेगमेंट कास्टींग आणि तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

6. 2018 मध्ये या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षांचा असून त्यानुसार सप्टेंबर-2020 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

समुद्रावरील सर्वात मोठा ब्रीज ठरणार! मुंबई शहर थेट रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील चिर्ले गावात पोहचणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नाव्हा - शेव्हा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत थेट पोहचता येणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील नाव्हा-शेव्हा परीसरात पोहचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबई पारबंदर प्रकल्पाचा आज शुभारंभ

गर्डच्या कामादरम्यानचे छायाचित्र (फोटो केडिट - शाहीद खान )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kesarkar : अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं
अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीचे लोकं आहेत का? मुख्यमंत्र्यांना हे पटतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल
मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीचे लोकं आहेत का? मुख्यमंत्र्यांना हे पटतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल
देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा
देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
Embed widget