BEST : वडाळा, कुर्ला, वांद्रे डेपोतील कंत्राटी बेस्ट बसचालक संपावर; टाटा रुग्णालय, केईएमकडे जाणाऱ्या बस बंद
BEST Workers Strike : कंत्राटी बेस्ट बस चालक संपावर गेल्यामुळे टाटा रुग्णालय, केईएमकडे जाणाऱ्या बसेस बंद झाल्या आहेत. यामुळं हॉस्पिटलकडे येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत.
![BEST : वडाळा, कुर्ला, वांद्रे डेपोतील कंत्राटी बेस्ट बसचालक संपावर; टाटा रुग्णालय, केईएमकडे जाणाऱ्या बस बंद BEST Contract bus drivers on strike at Wadala, Kurla, Bandra depots; Buses to Tata Hospital, KEM closed BEST : वडाळा, कुर्ला, वांद्रे डेपोतील कंत्राटी बेस्ट बसचालक संपावर; टाटा रुग्णालय, केईएमकडे जाणाऱ्या बस बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/21/697b731b0d8e92fa8436beb191b74aa2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BEST Workers Strike : मुंबईतील वडाळा, कुर्ला आणि वांद्रे डेपोतील (Wadala, Kurla, Bandra) कंत्राटी बेस्ट बस चालक संपावर गेले आहेत. कंत्राटदार कंपनीनं वेतन वेळेवर न दिल्यानं चालकांचं संपाचं हत्यार, संपामुळे टाटा रुग्णालय, केईएमकडे जाणाऱ्या बसेस बंद झाल्या आहेत. यामुळं हॉस्पिटलकडे येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. दरम्यान, इतर चालकांच्या मदतीनं बेस्ट सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.
कंत्राटदार कंपनीनं वेतन वेळेवर न दिल्यानं चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. वडाळा, कुर्ला, बांद्रा बेस्ट डेपोतील भाडेतत्वावरील बेस्ट बस चालकांनी हा संप पुकारला आहे. दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालय मार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत.
भाडेतत्त्वावर बसगाड्या चालवणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन सुरु केलं आहे. बेस्टच्या प्रशासनाने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बोलणी केली. बेस्ट प्रशासन बेस्टचे इतर नियमित कामगार नेमून बेस्ट बस सेवा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.
आमच्या घरी येऊन परिस्थिती बघा; कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांना साद
कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, गेले सहा महिने झालं हा प्रॉब्लेम सुरु आहे. कंपनीतून याबाबत कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. कंपनीनं आमच्या संवाद साधून जर आम्हाला म्हटलं की, आम्हाला तुमची गरज आहे, आम्ही तयार आहोत पण तुम्ही आम्हाला कोणतीही कल्पना देत नाहीत. कंपनीचे जे प्रतिनिधी आमच्याशी संवाद साधायला येतात ते आमच्याशी व्यवस्थित संवाद करत नाहीत. आम्हाला जर पगारासाठी एक तारीख दिली असेल तर त्या तारखेला आमचा पगार झालाच पाहिजे. आम्ही सगळे कामगार आहोत. आम्ही मोठ्या कष्टानं इथं काम करतो आहोत. त्यावरच आमचं घर चालतं, आमच्या घरी येऊन परिस्थिती बघा. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. आज शिवसेनेचे आमदार आहेत, मुख्यमंत्री आहेत. तुमच्या हातात सगळं आहे. परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही तर स्थिती बदलायला वेळ लागणार नाही. पगार आजच्या आज करा तरच गाड्या काढणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)