एक्स्प्लोर

या सरकारमध्ये आणि आधीच्या नालायक सरकारमध्ये फरक नाही : आदित्य ठाकरे

मुंबई : 2014 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर 'आपलं सरकार' आल्यासारखं वाटलं होतं. मात्र, गेल्या दोन वर्षात हवा तसा बदल न झाल्यानेच आजचा मोर्चा काढला आहे. आधीचं नालायक सरकार आणि या सरकारमध्ये काही फरक वाटत नाही, असा घणाघात शिवसेना-भाजपच्या सरकारवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांसंदर्भात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. त्यानंतर जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना भेटलो होतो, तेव्हा आश्वासन मिळाले होते की प्रश्न सोडवतो. पण गेल्या दीड वर्षांतला प्रवास हा सुशासन नसून आश्वासन असल्याचे वाटतं आहे. मागण्यांना एटीकेटी लागते की काय असं वाटतंय.", अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर केली. शिक्षणक्षेत्रातील समस्या मांडत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला सवाल केले आहेत. आदित्य ठाकरेंनी आपल्या सभेत मांडलेले मुद्दे : - केजीसाठी प्रवेश कायदा कधी येणार, याचे उत्तर हवे आहे. - पालक आणि विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, याची गरज नाही. - नववीत दीड लाख मुलं नापास झाली, ही आताची शिक्षणपद्धती. - अजून 2 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. - MKCL का बंद होत नाही, या मागे कोण आहे? - या वर्षी ऑनलाईन अॅडमिशनमधून 2 लाख विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळालं नाही. ऑनलाईन अॅडमिशनचं घोडं आणलं कोणी? - दप्तरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. डिजिटल इंडिया फक्त बोलण्यासाठी आहे. पण शिक्षणात त्याचा वापर का केला जात नाही? - सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारला पण उत्तर मिळाले नाही - आपण डिजिटल इंडिया म्हणतोय, तर शिक्षण खात्याची हेल्पलाईन आणि व्हाट्सअॅप नंबर हवा, वेबसाईटही हवी. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाच्या समस्या मांडत राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला खरा, मात्र, प्रश्न उपस्थित होतोय की, या सरकारमध्ये शिवसेनेचाही सहभाग आहे. त्यामुळे आपल्याच पक्षाला या समस्या सांगून त्यावर उपाय काढण्याऐवजी अशा प्रकारे मोर्चे योग्य आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
Lalbaugcha Raja News : एकुलता एक मुलगा... लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला, पण घरी परतलाच नाही, 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
एकुलता एक मुलगा... लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला, पण घरी परतलाच नाही, 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
Disha Salian Case: मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Embed widget