एक्स्प्लोर

Yashwantrao Chavan : हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! दगाबाज चीनच्या बंदोबस्तासाठी यशवंतराव जेव्हा दिल्लीत पोहोचले

भारताला गाफील ठेऊन चीनने 1962 साली भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला बोलावलं आणि संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली. 

नवी दिल्ली : देशावर ज्या-ज्या वेळी संकटं आली त्या-त्या वेळी मराठी माणूस दिल्लीच्या मदतीसाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. असंच एक मोठं संकट 1962 साली देशावर आलं. 'हिंदी-चीनी भाई-भाई' अशा घोषणा सगळीकडे दुमदुमत असताना चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला अन् भारतावर हल्ला केला. यामध्ये भारताला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीमध्ये बोलावलं आणि संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यावेळीच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे मथळे वृत्तपत्रात छापून आले. 

काय झालं होतं?
जवळपास एकाच वेळी स्वातंत्र्य झालेले भारत आणि चीन आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होते. शेजारील राष्ट्रांसोबत मैत्रीचे संबंध राखण्यावर, त्यांना सोबत घेऊन जाण्यावर नेहरुंचा भर होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मोओंच्या चीनपुढे मैत्रीचा हात पुढे केला. ही मैत्री इथंपर्यंत गेली की हिंदी-चीनी भाई-भाई च्या घोषणा दोन्हीकडून देण्यात आल्या. 

चीनने पाठीत खंजीर खुपसला
भारतासोबत मैत्रीचे धोरण स्वीकारणाऱ्या माओंच्या मनात मात्र वेगळंच काही होतं. त्यांनी नेहरूंच्या पाठीत खंजीर खुपसला.

 भारताला गाफील ठेवत चीनने 20 ऑक्टोबर 1962 रोजी आक्रमण केले. चीनने याची तयारी आधीपासूनच केली होती. भारताने मात्र तशी कोणतीही तयारी केली नव्हती. भारत-चीनचे हे युद्ध एक महिना चाललं. 21 नोव्हेंबर 1962 रोजी चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केला. 

भारताला या युद्धामध्ये नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे देशभर असंतोष पसरला. तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना 1 नोव्हेंबर रोजी राजीनामा द्यावा लागला. अशा परिस्थितीत देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोण सांभाळणार? नेहरुंच्या डोळ्यासमोर त्यावेळी फक्त एकच नाव आलं... ते म्हणजे यशवंतराव चव्हाण.

हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला
यशवंतराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. व्ही. के. कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर नेहरूनी यशवंतरावांना फोन केला आणि दिल्लीला येण्यास सांगितलं. देशावर ज्या-ज्या वेळी संकट येतात त्या-त्यावेळी मराठी माणूस कोणताही विचार न करता दिल्लीच्या मदतीला जातो हा इतिहास आहे. याचीच प्रचीती यशवंतरावांनी पुन्हा एकदा दिली. 

दिल्लीत गेल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाणांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयाचा पदभार सांभाळला. पुढे चार वर्षे यशवंतरावांकडे हे खातं होतं. त्यांच्याच कालावधीतच 1965 सालचं भारत-पाकिस्तान युद्ध झालं.

विश्वास सार्थ ठरवला, पाकिस्तानला धडा शिकवला
नेहरूंनी दाखवलेला विश्वास यशवंतरावांना सर्वार्थाने सार्थ ठरवला. चीनच्या धक्क्यातून सावरून त्यांनी पुढे दोनच वर्षामध्ये भारतीय लष्कराचं अत्याधुनिकरण केलं. पुढे झालेल्या 1965 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी पाकिस्तानला धूळ चारली. 

यशवंतराव चव्हाणांची आज जयंती. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मोठा हातभार लावला. महाराष्ट्रात काम करताना देशाला ज्यावेळी गरज पडली त्यावेळी त्यांनी तीही जबाबदारी यशस्वीपणे पेलली हा इतिहास आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना प्रणाम. 

संबंधित बातम्या: 

 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Embed widget