एक्स्प्लोर

अमरावतीतही नरभक्षक वाघाची दहशत, वाघोबा मनुष्यवस्तीत का घुसतोय?

यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीला हटवण्याचे प्रयत्न अयशस्वी होत असतानाच आता अमरावतीमध्ये नरभक्षक वाघाने दोन जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे विदर्भात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

नागपूर : देशाचं व्याघ्र प्रवेशद्वार असलेल्या विदर्भात आता जंगलच भीतीचं कारण ठरतं आहे. एकीकडे 13 लोकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीची शोध मोहिम ही यवतमाळ येथे सुरु आहे, तर दुसरीकडे म्हणजेच अमरावतीत, एका नवीन नरभक्षक वाघामुळे थरकाप उडाला आहे. तीन दिवसात अंजनसिंगी परिसरात या वाघाने दुसरा बळी घेतला आहे. साल 1973 मध्ये रॉयल बंगाल टायगरची घसरती संख्या बघता प्रोजेक्ट टायगरचा (व्याघ्र प्रकल्प) जन्म झाला. जंगलाच्या 'कोर' म्हणजेच हृदयात फक्त आणि फक्त वन्यजीव राहतील अशी व्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे झपाट्याने वाघांची संख्या वाढली. पण मग हा 'कोअर' आता वाढलेल्या वाघांच्या संखेसाठी पुरेसा नाही. हे वाघ आजूबाजूला बाहेर म्हणजेच बफरमध्ये येऊ लागले. तिथेही संख्या बरीच वाढली आणि वाघाचा माणसाशी संघर्ष सुरु झाला. अमरावतीच्या या नवीन नरभक्षक वाघासारखे अनेक वाघ आहेत ज्यांना आपले नैसर्गिक 'कोर' जंगल माहितीच नाही. यवतमाळ जिल्ह्यातील वाघिणीने मारलेल्या 13 लोकांपैकी 11 गुराखी होते आणि दोन जण हे शेतात शिरून मारलेले शेतकरी. शेतात रात्री पाळत ठेवायला जाताना आणि सकाळी घरी परत येतानाची वेळ होती. दोन्ही वेळा वाघाच्याही भ्रमंतीच्या वेळा आहेत. जनावरांवर संसार चालवणाऱ्या विना सिंचनाच्या शेतकऱ्याला चाऱ्यासाठी कितीही नाही म्हटले तरी जंगल हे गाठावेच लागते. सरपण वेचायला जंगलात जाणे हे अवैध आहे, हे त्याला माहिती जरी असले, तरी गरीबीसमोर नाईलाज असतो. अशा अनेक कारणामुळे गावकरी हा स्वतःहून वाघाला आडवा जात असतो. फक्त मनुष्यच वाघाला आडवा जातो असे नाही, तर अनेक वेळा वाघही माणसाला आडवा येतो. वाढत्या संख्येमुळे कोर आणि बफरमधून जे वाघ गावाच्या आसपास फेकल्या जातात, त्यांना लवकर समजते की हरणाच्या शिकारीपेक्षा गावातील गुरे ही सोपी शिकार आहे. तसेच पाहिजे तशी grasslands म्हणजेच गवताळ जंगलं ही निर्माण झाली नाहीत ही प्रोजेक्ट टायगरची शोकांतिका आहे. त्यामुळे वाघाचा आकडा वाढत असला, तरीही त्याच्या भक्ष्यांचा आकडा तुलनेत वाढत नाही. त्यामुळे वाघ गुरांच्या शोधात येत आहे. दुसरीकडे 'बीफ बॅन' मुळे भाकड जनावरांना आता आजूबाजूच्या जंगलात सोडून दिल्या जाते ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे वाघ त्या परिसरात सुखावतो. जर एकीकडे मनुष्य वाघाच्या घरात घुसत असला, तरी दुसरीकडे वाघही या कारणांमुळे मनुष्याला आडवा जात आहे. मनुष्य-प्राणी संघर्षातून वाचण्यासाठी वन्यजीवप्रेमी आणि गावकरी अनेक सूचना सध्या करत आहेत. त्याचे अवलंबन झाले तर वेळ लागेल, पण नक्कीच हा संघर्ष कमी होऊ शकेल आणि मनुष्यजीवही थोडा सुरक्षित होऊ शकेल. कारण शेवटी वाघाच्या वाढत्या संख्येला जपायचे असेल तर आजूबाजूच्या मनुष्यवस्तीच्या त्याच्यासाठी सहानभूती कायम राहणं गरजेचं आहे. त्यामुळे नरभक्षक वाघाची सोय ही ताबडतोब लावली नाही, तर एका वाघासाठी सर्व वाघांचे वास्तव्य धोक्यात येऊ शकते. हा संघर्ष खरंच कमी करायचा असेल, तर सध्याचे  'वाघ केंद्रित' व्यवस्थापनाच्या कक्षा वाढवाव्या लागतील. गावकऱ्यांना नुसतं जंगलात जाऊ नका हे म्हणण्यापेक्षा, त्यांचे जीवन कसे जंगलावर विसंबून राहणार नाही यासाठी पाऊले उचलावी लागतील. जंगल विकासाचा सध्याचा पॅटर्नही बदलावा लागेल. हे सर्व करायचे असेल तर एक पूर्ण नवीन दृष्टिकोनच लागणार आहे. नाहीतर हा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढण्याचेच लक्षणे आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Education : इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; जूनपासून लागू होणार नवा आराखडा
इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; जूनपासून लागू होणार नवा आराखडा
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget