एक्स्प्लोर

गेल्या दोन वर्षांपासून विठ्ठल मंदिराने फायर ऑडिटच केले नाही, हजारो भाविकांच्या जीवाशी होतोय खेळ

शॉर्ट सर्किट किंवा वातानुकूलित यंत्रणेमुळे आगीच्या दुर्घटना सातत्याने समोर येत आहे. विठ्ठल मंदिराचे गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिटच केले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पंढरपूर : लाखो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिराचे गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिटच केले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वर्षाकाठी सव्वा ते दीड कोटी भाविकांची ये-जा असणाऱ्या या वास्तूमध्ये वातानुकूलित यंत्रणा, अस्ताव्यस्त वायरिंग यामुळे मंदिराला आगीचा धोका संभवू शकतो. यामध्ये देवाचे किचन देखील मंदिरात असल्याने दरवर्षी मंदिराचे फायर ऑडिट करून त्रुटी दूर करणे अत्यंत महत्त्वाचे असायला हवे होते. मात्र 2018 नंतर मंदिराने फायर ऑडिट करून न घेतल्याने आता मुख्यमंत्र्यांकडे असणाऱ्या विधी व न्याय विभागालाचं यात लक्ष घालावे लागणार आहे.

शॉर्ट सर्किट किंवा वातानुकूलित यंत्रणेमुळे आगीच्या दुर्घटना सातत्याने घडत असतात. यातच विठ्ठल मंदिरात सध्या असलेले वायरिंग अतिशय धोकादायक पद्धतीचे असून लाकडी विठ्ठल सभामंडपाच्याकडेनेच हे वायरिंग नेण्यात आलेले आहे. याच्या शेजारून दर्शनाची रांग मंदिराच्या छतावरून जात असते. याशिवाय मंदिराला लागून असलेला सात मजली दर्शन मंडप अतिशय चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला आहे. याला आपत्कालीन वेळेस बाहेर पडायचा मार्गचं नसल्याने आता मंदिर प्रशासन 7 मजल्यापैकी केवळ एकाच मजल्याचा वापर करीत आहे.

विठ्ठल मंदिराचा DPR पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने बनवून घेण्याचे काम सुरु असून काही दिवसापूर्वी इन्फ्रा रेड कॅमेराने मंदिराच्या वस्तूची तपासणीही करण्यात आलेली आहे. विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असून अशी पुरातन आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्राबाबत गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे असताना मंदिराने गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिट न करणे हा खूप गंभीर प्रकार आहे.

याबाबत मंदिराकडून मात्र सध्या कोरोना असल्याने कमी भाविक मंदिरात येतात. त्यामुळे फायर ऑडिट राहिल्याचे कारण पुढे करीत येत्या मार्च किंवा एप्रिल मध्ये हे करून घेतले जाईल असे सांगितले आहे. याबाबत विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या भावना तीव्र असून भाविकांच्या जीवाशी खेळ न करता तातडीने फायर ऑडिट करून घेण्याची मागणी भाविकांतून पुढे येत आहे.

विठ्ठल मंदिर ज्या विधी व न्याय विभागाच्या ताब्यात आहे त्याचा कारभार खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असून ते स्वतः विठ्ठल भक्त असल्याने लाखो भाविकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी फायर ऑडिटसारखे विषय तरी गांभीर्याने हाताळण्याचे आदेश मंदिर समितीला देतील.

संबंधित बातम्या :

Bhandara Fire Tragedy | भंडाऱ्यातील दुर्घटनेवेळी रुग्णालय कर्मचारी झोपेत होते? 10 चिमुकल्यांचा मारेकरी कोण?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget