एक्स्प्लोर

Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम; पुढील पाच दिवस नागपूरसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी

Weather Forecast : आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

Vidarbha Unseasonal Rain : गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे उष्णतेचा (Heat) पारा तापत असताना विदर्भात मात्र सलग पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. अशातच आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर आज नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर हा यलो अलर्ट पुढे 22 मे पर्यंत कायम राहणार आहे. संभाव्य इशारा लक्षात घेता शेतकर्‍यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पासून पुढील पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह 40-50 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या, 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलाय. 

शेतात जमीनदोस्त झालेल्या भात पिकांना अंकुर 

गेल्या दोन आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कापणीला आलेले भातपीक जमीनदोस्त झाले आहे. तर काही ठिकाणी कापून ठेवलेला भातपीक पावसात सापडल्यानं ओले झाले आहे. या घटनेला आता आठवडा लोटला असला तरी, आजही अनेकांच्या शेतात अवकाळीचे पाणी साचून आहे. परिणामी अनेकांची मळणी रखडली आहे. या अवकाळी पावसानं शेतकरी पुरता हतबल झाला असून आर्थिक विवंचनेत अडकला आहे. आता तर, आठवड्यापासून भातपीक पाण्यात असल्यानं शेतातच जमीनदोस्त झालेल्या भात पिकांना अंकुर फुटल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 

लिंबूचे दीडशे झाडं उन्मळून पडली

वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. यात वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील शेतकरी अनिल बुद्धिवंत यांच्या शेतातील लिंबूचे दीडशे झाडं उन्मळून पडली असून त्यात त्यांची संपूर्ण बाग उध्वस्त झालीये. यावर्षी त्यांची बाग चागलीच बहरली होती. तसेच लिंबु पिकाला चांगले दर देखील मिळत होते. कडक उन्हामुळे लिंबूची मागणी वाढल्याने  याच बागेतून दीड लाखाचे उत्पन्न मिळाले होते. तर येत्या महिन्याभरात हजारो रुपये उत्पन्न होण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र त्याआधीच नैसर्गिक संकटाने अचानक बाग उध्वस झाल्याने अनिल बुद्धिवंत हवालदिल झालेत. या नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.

मिरची उत्पादकांना अवकळी पावसाचा फटका 

भंडारा जिल्ह्यात धान पीक हे मुख्य उत्पादन असलं तरी आता नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी बागायती शेतीच्या माध्यमातून मिरचीचं उत्पादन घेऊ लागले आहेत. मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळं भात पीक जमीनदोस्त झालंच तर, पालेभाज्यांच्या शेतीलाही मोठा फटका बसलाय. सोबतच मिरची पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळतंय.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget