एक्स्प्लोर

आनंदाची बातमी... उजनी धरण 100 टक्के भरलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे 100 टक्के भरले आहे. उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंढरपूर : पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे 100 टक्के भरले आहे. सलग तिसऱ्या वर्षी धरण 100 टक्के भरले आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख धरणांपैकी महत्त्वाचे असणारे उजनी धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात आज 117 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 27 ऑगस्ट 2018 ला, यानंतर 7 ऑगस्ट 2019 ला व आज 31 ऑगस्ट 2020 ला उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.

पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात वरील बारा धरणात झपाट्याने वाढ झाली आहे. बरीच धरणे भरली असून त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे आज अखेर उजनी धरणात 117 टीएमसी पाणी साठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या दौंडवरून 23 हजार क्यूसेक विसर्गाने पाणी येत आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलं असल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे, सोलापूर, नगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण पुणे परिसरात होत असणाऱ्या पावसामुळे वेगाने भरले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे भरली आहेत. त्यामुळे त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी साठ्यात अजून अधिक वाढ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास वरदायिनी असलेले उजनी धरण मायनसमध्ये गेले होते. आता ते 100 टक्के भरलं असल्याने शेतकरी वर्ग खुश झाला आहे. उजनीवर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत जोरदार वाढ झाली आहे.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास कृषी विकासाला हातभार लागलेल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्याकडे नेहमीच शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या उन्हाळ्यात उजनी धरण मायनसमध्ये गेले होते तर जून 2020 मध्ये सर्वात निचांकी म्हणजेच मायनस - 24.15 टक्क्यांपर्यंत गेलेल्या धरणात पुणे जिल्ह्यातून व भीमा खोऱ्यात पडलेल्या पावसाचे पाणी आल्याने पाणी पातळी वाढली होती.

संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी चंद्रभागेवरील भराव दुरुस्तीस नगर पालिकेकडून सुरुवात पंढरपूर शहरानजीक दगडी पुलाशेजारी असलेल्या बंधाऱ्याच्या वरील बाजूकडील भराव वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्यास मोठा धोका उत्पन्न झाला होता. सदर भराव वाहून गेल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यंदा सर्वत्र चांगला पाऊस सुरू असून उजनी धारणातही वेगाने पाणी जमा होत आहे. अशावेळी संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी अखेर नगरपालिकेने या बंधाऱ्याच्या मजबुतीकरण करण्यास सुरुवात केल्याने परिसरातील नागरिकांत भीती कमी झाली आहे . या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा होत असल्याने बंधाऱ्याच्या भराव खचू लागला होता .
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget