एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!'; उद्धव ठाकरेंचा मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही हल्लाबोल

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखती दुसरा भाग आज प्रसारीत झाला आहे. या भागात बंडखोरांसह केंद्र सरकार, भाजपवर ठाकरेंनी थेट निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray Interview by Sanjay Raut : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला आहे. या भागात बंडखोरांसह केंद्र सरकार, भाजपवर ठाकरेंनी थेट निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच! अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांच्या अभूतपूर्व बंडाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. या सर्व घडमोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच 'सामना'चे (Saamna) कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला.  

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मुंबई महापालिकेविषयी शंका निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेनेचा पराभव करू अशा वल्गना सुरू आहेत.  याच्या पूर्वी अनेकांनी म्हटलंय की, 'शिवसेना' या निवडणुकीनंतर राहणार नाही वगैरे! मुंबईत आता मुंबईकर म्हणून सगळे एकत्र आलेत. त्यावेळी त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला की, हे मराठी ते अमराठी वगैरे, पण आता ही सगळी मंडळी मला येऊन भेटताहेत. मराठी, अमराठी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आजसुद्धा सुरू आहे. पण आता याला कोणी बळी पडणार नाही. मराठी माणसं एकवटली आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय आणि माझं मत असं आहे की, मुंबईच्याच नव्हे, तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात.

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? 

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? असा सवाल ठाकरे यांना संजय राऊतांनी विचारला असता ते म्हणाले की, का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख? असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्यांना मी आपले मानले , तीच माणसं सोडून गेली . म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती . त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही.भाजपात आज बाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जातंय. महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही . लोकांनी स्वागतच केले . ' वर्षा ' सोडून जाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू ढाळले . कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले ? त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही !'' असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीवाल्यांना शिवसेना विरुद्ध शिवसेना असा झगडा लावायचाय

उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकशाहीचे भवितव्य , विरोधी पक्षांना खतम करण्यासाठी सुरू असलेला ' ईडी ', ' सीबीआय ' चा गैरवापर यावरही भाष्य केलं आहे.  दिल्लीवाल्यांना शिवसेना विरुद्ध शिवसेना असा झगडा लावून महाराष्ट्रात मराठी माणसांकडून मराठी माणसांचीच डोकी फोडायची आहेत !'' विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल. लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त होत नसतात. जय-पराजय सगळ्य़ांचेच होत असतात. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे. आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली असे मी म्हणणार नाही . पण ज्या दिशेने पावलं पडताहेत ती पाहता अनेक जणांचं मत आहे की , ही पावलं , ही लक्षणं काही बरी नाहीयत . चुकीच्या दिशेने पडताहेत , असेच अनेकांचे मत आहे .
  
प्रादेशिक पक्ष संपविण्याचे कारस्थान जोरात सुरू 

देशातले विरोधी पक्ष , प्रादेशिक पक्ष संपविण्याचे कारस्थान जोरात सुरू आहे.   देशातील आताची परिस्थिती अगदी तशीच आहे. मात्र विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल. लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त होत नसतात. जय-पराजय सगळय़ांचेच होत असतात. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे. पण सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते. मीही मुख्यमंत्री होतो. आज नाहीय, पण तुमच्यासमोर पहिल्यासारखा बसलोय. काय, फरक काय पडला? सत्ता येते आणि जाते. मग सत्ता परत येते. माझ्यासाठी म्हणाल तर, सत्ता असली काय आणि नसली काय, काहीच फरक पडत नाही. अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, 'सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.' देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण देशाला आजसुद्धा अनेक प्रश्न भेडसावताहेत. सध्या रुपयाने नीचांक आणि महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी आहे. अशा सगळ्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही. थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Interview : 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार

Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव

Uddhav Thackeray Interview : माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे
   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
Marriage Letter to Sharad Pawar: माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम
Jai Shri Ram Row: 'जय श्रीराम' म्हटल्याने विद्यार्थ्याला मारहाण, Pen मधील शिक्षक Momin पोलिसांच्या ताब्यात
Human-Leopard Conflict: Nashik च्या Devgaon मध्ये बिबट्या जेरबंद, ठार मारण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
Marriage Letter to Sharad Pawar: माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोटाचा भयानक व्हिडीओ अखेर समोर आला, त्या क्षणी नेमकं काय घडलं?
दिल्ली बॉम्बस्फोटाचा भयानक व्हिडीओ अखेर समोर आला, त्या क्षणी नेमकं काय घडलं?
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Embed widget