एक्स्प्लोर

आमची मेगाभरती नाही लिमिटेड भरती : मुख्यमंत्री

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांसह अनेकांनी 31 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. आता 10 ऑगस्ट रोजी भाजपची दुसरी मेगाभरती होणार असल्याचं कळतं.

वर्धा : "आमची मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती आहे. परंतु जे भाजपच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवतील त्यांना नक्कीच पक्षात घेऊ," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपची राज्यभरात महाजनादेश यात्रा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मेगाभरती, ईव्हीएम, युतीच्या जागावाटपासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मेगाभरती नाही, लिमिटेड भरती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांसह अनेकांनी 31 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. आता 10 ऑगस्ट रोजी भाजपची दुसरी मेगाभरती होणार असल्याचं कळतं. याविषयी विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "ही मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती आहे. आम्ही भरती बंद केलेली नाही. पण विदर्भातील काही लोक येण्यास तयार असतील आणि जे पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवतील तर त्यांना नक्की पक्षात घेऊ. आमच्याकडे लिमिटेड जागा आहे, त्यामुळे येण्यास इच्छुक खूप आहे, पण आम्ही सगळ्यांना घेऊ शकत नाही. काहींना घेतलं, काही येऊ शकतात पण फार नाही." शपथेवरुन राष्ट्रवादीला टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत्यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर काल राष्ट्रवादीने शपथेचा कार्यक्रम घेतला. यावरुन राष्ट्रवादीचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. "आज काही पक्षांची अशी अवस्था झालीय, की कोणी त्या पक्षामध्ये राहायलाच तयार नाही. पक्षातच राहू म्हणून शपथ देण्याचा कार्यक्रम काहींना करावा लागतोय. ज्यांनी शपथ घेतली ते तरी पक्षात राहतात का हे मला माहित नाही," असं मुख्यमंत्री म्हणाले. आमचा हाऊसफुलचा बोर्ड लागलाय "आमच्या पक्षात सक्षम कार्यकर्त्यांची कमतरता आहे. आजही काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक आमच्याकडे यायला तयार आहेत. पण आम्ही त्यापैकी काहींनाच घेणार आहे. ज्यांची  लोकप्रियता आहे, जनाधार आणि ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या काहींनाच घेणार आहे. सगळ्यांसाठी आमच्याकडे जागा नाही. आमचा हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे," असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. जागावाटपाबाबत राज्यातील नेत्यांना अधिकार "पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपाच्या वाटाघाटीचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिले आहेत. शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपावरुन अडचणी येतील. कारण काही ठिकाणी, शहरांमध्ये सगळ्या जागा आमच्याकडे आहेत. तर काही ठिकाणी त्यांच्या जागा जास्त आहेत. युतीत लढणार आहोत, तर काही गोष्टी मिळतील, काही मिळणार नाही. त्यामुळे आम्ही चिंता करत नाही," असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच युतीला ज्याप्रकारे समर्थन मिळतंय, ते पाहता आम्हाला अभूतपूर्व विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन करावं ईव्हीएमविरोधात राज्यभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. आज या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाआघाडीतील नेते एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. याविषयी विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केलं तर ते उत्तम होईल. सत्य स्वीकारण्याऐवजी आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि असत्याची कास धरतात. ईव्हीएम आता आलेलं नाही. या ईव्हीएमच्या कालावधीत दहा वर्षात त्यांनी केंद्रपासून राज्यात सगळीकडे राज्य केलंय. ईव्हीएमवर आंदोलन करण्याऐवजी जनतेत गेले आणि आम्ही हे केलं नाही, भविष्यात करु असं सांगितलं तरी जनता काही ना काही समर्थन देईल."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget