एक्स्प्लोर

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच भाकरी फिरणार, काय होणार बदल? पाहा...

Maharashtra Politics: शरद पवारांच्या वक्तव्यानुसार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाकरी फिरणार आहे, लवकरच पक्षात बदल पाहायला मिळणार आहेत.

Maharashtra Politics: राष्ट्रवादी पक्ष संघटनेत लवकरच भाकरी फिरणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्ष संघटनेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदावर असणाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून विभागवार शिबिरं घेण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिबिरांमध्ये राज्यातील प्रश्नांवर देखील चर्चा करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीकडून 10 जूनला अहमदनगर जिल्ह्यात भव्य सभेचं आयोजन

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी, म्हणजेच येत्या 10 जूनला राष्ट्रवादीकडून अहमदनगर जिल्ह्यात भव्य सभेचे  आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आणि छत्रपती राज्याभिषेक दिवस एकत्र साजरा करण्यात येणार आहे. यावेळी, राष्ट्रवादीत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बदलले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

महाविकास आघाडी भक्कम ठेवा, शरद पवारांच्या आमदारांना सूचना

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (17 मे) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा मुद्दा हा केंद्रस्थानी होता. बैठकीत शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा आणि विधानसभा एकत्रितच लढवायच्या आहेत, असे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतून एकत्र लढण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कोअर कमिटीच्या बैठकीत केली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पण मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार, याविषयी सूतोवाच करण्यात आलेलं नाही.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी

मागील लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यावर विभागवार जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, जितेंद्र आव्हाडांवर ठाणे-पालघरची, धनंजय मुंडेंवर नाशिक, नगरसह मराठवाड्याची, अनिल तटकरे आणि शेखर निकमांवर कोकणची, तर अनिल देशमुखांवर विदर्भातल्या नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेंद्र शिंगणेंवर विदर्भातल्या अमरावती विभागाची, शशिकांत शिंदेंवर सांगली, सातारा आणि कोल्हापूरची जबाबदारी, तर सुनील शेळकेंवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

विदर्भ (नागपूर विभाग)
अनिल देशमुख

विदर्भ (अमरावती विभाग) 
राजेंद्र शिंगणे

कोकण विभाग (ठाणे, पालघर)
जितेंद्र आव्हाड

मराठवाडा विभाग (नाशिक, नगर)
धनंजय मुंडे

पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर, सातारा,सांगली) 
शशिकांत शिंदे

पश्चिम महाराष्ट्र (पुणे)
सुनील शेळके

पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर)
अशोक पवार

हेही वाचा:

Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब? मंत्रिमंडळाबाबत काँग्रेसकडून महत्त्वाची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget