एक्स्प्लोर

गुप्त बैठक 200 लोकांसमोर होत नसते, फडणवीसांसोबतच्या भेटीच्या दाव्यावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

बैठक बंद खोलीत झाली नाही, दाराआड झाली नाही, तर समोरासमोर झाली. गुप्त बैठक 200 लोकांसमोर होत नसते, अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त भेट झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला होता.

मुंबई : "गुप्त बैठक 200 लोकांसमोर होत नसते," असं सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रत्नागिरीत गुप्त भेट झाल्याचा इन्कार केला. बैठक बंद खोलीत झाली नाही, दाराआड झाली नाही, तर समोरासमोर झाली. त्यावेळी आरोप करणारे माझ्यासमोरच बसले होते. जी चर्चा झाली ती स्वागताच्या दृष्टीने झाली आणि सगळ्यांच्या समोर झाली, असं उदय सामंत म्हणाले. माजी खासदार निलेश राणे यांनी उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीतील विश्रामगृहात गुप्त भेट झाल्याचा दावा केला होता. त्यावर उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, "ज्या मंडळींना कोकणाने दोन वेळा नाकारलं आहे, त्यांनी माझं राजकीय अस्तित्त्व अस्थिर करण्यासाठी माझी गुप्त भेट झाली असं ट्वीट करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही. जनतेने त्यांची दखल घेतली नाही तर माझ्यासारख्या मंत्र्यांनी का घ्यावी? ज्याला गुप्त बैठक करायची आहे तो रत्नागिरी मतदारसंघात का करेल? रत्नागिरीच्या रेस्ट हाऊसमध्ये का करेल? 200 माणसांच्या समोर का करेल? गुप्त बैठक करायची असेल तर नागपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई या ठिकाणी करेल. असे ट्वीट करुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावरील विश्वास उडेल असं जर त्यांना वाटत असेल तर हा बालिशपणा आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलणं मी सहसा टाळतो."

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीबाबत अधिक सांगताना उदय सामंत म्हणाले की, "ही घटना सहा दिवसांपूर्वी घटली आहे. मी रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर होतो. रत्नागिरी विश्रामगृहावर एक वाजता पोहोचलो होतो. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे आले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, त्याचं पालन करणं मी कर्तव्य समजतो. आपल्यापेक्षा सीनियर व्यक्ती, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता समोर येतो, तेव्हा स्वागत असल्याचं सांगण्याची पद्धत असते. सदिच्छा म्हणून मी स्वागत केलं असेल तर मी कोणतंही पाप केलेलं नाही. मी एकटा-दुकटा कोणाला भेटलेलो नाही. ज्यांनी आरोप केला, ते प्रचंड मागे होते. त्यामुळे कदाचित दिसण्यात फरक पडू शकतो. फडणवीस माझ्या मतदारसंघात आल्यानंतर आणि मी सुरुवातीला विश्रामगृहात होतो म्हणून त्यांना हाय-बाय करण्यासाठी भेटलो असेन तर मी गुन्हा केला असं मला वाटत नाही. 

बैठक बंद खोलीत नाहीत, दाराआड झाली नाही, कुठेच झाली नाही, समोरासमोर झाली. त्यावेळी आरोप करणारे माझ्यासमोरच बसले होते. जी चर्चा झाली ती स्वागताच्या दृष्टीने झाली आणि सगळ्यांच्या समोर झाली. त्यावेळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा माझ्यावर विश्वास आहे. असे ट्वीट करुन माझं राजकीय करिअर थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते थांबणार नाही, असंही उदय सामंत यांनी नमूद केलं.

ऑपरेशन लोटसकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही
ऑपरेशन लोटस होणार नाही. भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. आमची महाविकास आघाडी मजबूत आहे. त्यामुळे ऑपरेशन लोटस गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही.

फडणवीस आणि दरेकरांना सल्ला आहे की... : उदय सामंत
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना मित्र सल्ला द्यायचा आहे की, अशा पद्धतीने राजकीय संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बरोबर ठेवणार असू तर भविष्यातील महाराष्ट्राचा राजकारण काय असू शकतं याची प्रचिती आजच्या ट्वीटवरुन कदाचित आली असेल. 

निलेश राणे काय म्हणाले होते?
माजी खासदार निलेश राणे यांनीच सामंत-फडणवीस भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला. "तोक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली," असा निलेश राणे यांनी सांगितलं.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, पंढरपूर तालुक्यात कोसळल्या विजा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 
राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, पंढरपूर तालुक्यात कोसळल्या विजा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 
जमीनीच्या वादातून शेतकऱ्याला संपवलं, धक्कादायक घटनेनं गोंदिया हादरलं, सहा आरोपींना अटक 
जमीनीच्या वादातून शेतकऱ्याला संपवलं, धक्कादायक घटनेनं गोंदिया हादरलं, सहा आरोपींना अटक 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget