एक्स्प्लोर

Maharashtra Corona Crisis : कोरोना प्रश्न हातळण्यात राज्य सरकार अपयशी; भाजप नेते गिरीश महाजन यांचा आरोप

लोकांच्या समस्या राज्य सरकार सोडू शकत नसल्याने सरकारने हात वर केल्याचा आणि सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. कोरोनाच्या या कठिण काळात जनतेने आता जावे तरी कोणाकडे, असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला आहे.

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्य सरकारच्या कामावर भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे अनेक लोकांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. लोकांना त्यांच्या कोणत्याचं समस्येवर उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मरणाशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. लोकांच्या या समस्या राज्य सरकार सोडू शकत नसल्याने सरकारने हात वर केल्याचा  आणि सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. कोरोनाच्या या कठिण काळात जनतेने आता जावे तरी कोणाकडे, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाचा प्रसार सर्वत्र वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची चाचणी केली गेली पाहिजे, ती केली जात नसल्याने कोरोनाचा प्रसार अधिक वाढत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना कोरोना चाचणी सक्तीची केली पाहिजे असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोनाची लस मिळत नसल्याने राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. पण आधी राज्य सरकारने बाधित झालेल्या रुग्णांच्या बाबत उचारासाठी काय उपाय योजना केल्या, त्याबाबत सांगावं, आणि मग केंद्राकडे बोट दाखवलं पाहिजे. याकाळात राजकारण करत बसल्याने लोकांचे नाहक जीव जात आहेत. या सर्व परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असून, कोरोनाचा संपूर्ण विषय हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. सरकारने या विषयाकडे  गांभीर्याने पाहिलं पाहिजे, ही जबाबदारी सरकारची असून लोकांना वाऱ्यावर सोडून चालणार नसल्याचंही महाजन यांनी म्हटलं.

अनिल देशमुखांवर आरोप अधिकाऱ्यांनी केले आहेत, त्यामुळे विरोधकांकडे बोट दाखवणे योग्य नाही

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी  केलेले आरोप पाहता देशमुख यांनी चौकशीला समोर जायला  हवे, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. विविध ठिकाणाहून पैसे गोळा करण्याचे आरोप पाहता पोलिसांच्या मध्यामतून हा मोठ्या खंडणीचा प्रकार आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे अधिकाऱ्यांनी केले आहेत, त्यामुळे विरोधकांकडे बोट दाखवणे योग्य  नसल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला समोरं जावं.  चौकशीअंती खरं-खोटं समोर येईल. त्यात काही तथ्य नसेल तर प्रश्नच राहणार नाही, असंही महाजन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget